अडगळीत सापडलेल्या समाज बांधवांना चर्मकार उठाव संघाकडून महिन्याचा शिधा,,
चाळीसगाव(प्रतिनिधी):-आपण ज्या समाजात जन्मलो त्याच काहीतरी देणं लागतो ज्या परिसरात लहानाचे मोठे झालं त्यांचे देखील आपल्यावर ऋण असते आणि आपण अडगळीच्या काळात ती फेडली तर निश्चित ही बाब सदैव आठवणीत राहणारी असते आज करोना नावाच्या महामारीने जगाला विळखा घातला आहे यावर एकमेव उपाय आहे घरात बसणे स्वताला सर्व काम धंदे सोडून घरात कैद करुनचं या आजारावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकत आपण स्वताला व परिवाराला सुरक्षित ठेवू शकतो यात शँका नाही मात्र हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांनी जगावं कस असा प्रश्न उपस्थीत झाल्याशिवाय राहत नाही अशा परिवाराची उपासमार होऊ नये म्हणून चर्मकार उठाव संघ सरसावला असुन चाळीसगाव शहरातील 40 कुटुंबांना महिन्याचा किराणा घरपोच देण्याचं काम आज सायंकाळी 6 ते 8;30 या वेळेत करणयात आलं हे काम करताना कुठलाही गाजावाजा करण्यात आला नाही सरळ अडचणीत असलेल्या समजातील व इतर 40 परीवार शोधून सरळ प्रदेश अध्यक्ष मोतीलाल अहिरे, डिगाम्बर मोरे ,संजय वानखेडे, आनंद गांगुर्डे,कृष्णा वाघ, भैया देवरे ,जगदीश सोनवणे,खुशाल मोरे,राहुल नकवाल, मंगेश गांगुर्डे, बाला अहिरे, गोलू चौधरी, विरल माळी, विशाल कोळी, यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना महिन्याचा किराणा बहाल केला व शासनाच्या आदेशाचं पालन करा घराबाहेर पडू नका आशा सूचना केल्या हेच खर सामाजिक कार्य असल्याचं यावेळी अनेकांनी सांगितलं,