जीवनवाहिनी अर्थात परिवहन महामंडळाच्या “एसटी’लाही कोरोनाचा फटका-जळगाव आगरास २ कोटींचे नुकसान
जळगाव : प्रवासी वाहतूक करणारी ग्रामीण भागाची जीवनवाहिनी अर्थात परिवहन महामंडळाच्या “एसटी’लाही मोठे नुकसान झाले आहे. कोरोना व्हायरस’ची आर्थिक झळ देशाला सहन करावी लागत आहे.मागील आठ दिवसांत विभागाला दोन कोटी रुपये उत्पन्नाचा फटका सहन करावा लागला आहे. प्रवासी संख्या कमी होऊन फेऱ्या रद्द कराव्या लागत आहेत. परिणामी विभागात एका दिवसाला दोन हजार फेऱ्या रद्द कराव्या लागत असून,विभागाला दोन कोटींचे नुकसान विभागातून दिवसभरात होणाऱ्या फेऱ्यांमधून साधारण एक ते सव्वाकोटीचे उत्पन्न रोज मिळते. परंतु रोज रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे साधारण पंचवीस लाख रुपयांचे नुकसान होत असून, गेल्या आठ दिवसांत सहा ते सात हजार फेऱ्या रद्द झाल्याने दोन कोटी रुपयांचे नुकसान महामंडळाच्या जळगाव विभागाला झाले आहे.जळगाव विभागाला लांबपल्ल्याच्या फेऱ्यांमध्ये पुणे मार्गावर सर्वाधिक उत्पन्न मिळते. परंतु मागील पाच दिवसांपासून पुणे मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द झाल्या आहेत. जळगाव आगारातून पुण्यासाठी रोज पाच शिवशाही बस सोडण्यात येतात. या पाचही फेऱ्या रद्द झाल्या आहेत. याशिवाय जळगाव आगारातून पंढरपूर, लातूर आणि नवसारी (गुजरात) प्रत्येकी एक फेरी रद्द झाली आहे. यातून मिळणारे तीन ते चार लाख रुपयांचे उत्पन्न घटले आहे.