दहावीच्या परीक्षेसंबधित आवश्यकता असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरीहून काम करावे.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई:- कोरोना च्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आज पहिली ते आठवी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला बालकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता या संदर्भातील शासनाने हा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या राज्यातील परीक्षा यंदा रद्द केल्या असून वर्षभरातील विद्यार्थ्यांचे मापन संकलित करून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात येणार तसेच
दहावीच्या परीक्षेसंबधित आवश्यकता असलेले शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सोडून उर्वरित सर्वांनी घरीहून काम करावे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी बालकांनी आणि पालकांनी काळजी घ्यावी आणि शासनातर्फे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आवाहन