बेघर कुटुंबाना तत्काळ मदत दया पीपल्स सोशल फाउंडेशनची मागणी
चाळीसगाव(प्रतिनिधी):- आज संपुर्ण देशात कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे, तसेच शासनाने जनधन खात्यात मदत देणार,रेशनकार्ड धारकांना 3 महिन्याचे रेशन देणार,उज्वला या योजने अंतर्गत गॅस मिळणार पण जे बेघर आहेत, ज्या लोकांचे रेशनकार्ड नाही,बँक खाते नाही अश्या लोकांना मदत कशी मिळणार या अश्या कुटुंबांसाठी शासनाचे नियोजन काय हा प्रश्न मार्गी लागणे खूप गरजेचे आहे . प्रभाग क्र 2 मधील मुस्लिम कब्रस्तान लगत असलेल्या झोपडपट्टी धारक कुटूंब हे सद्यस्थितीत काम नाही कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करणार जर यांना वेळेवर मदत मिळाली नाही तर यांच्यावर उपासमारीची वेळ येईल त्यांच्या कडे रेशनकार्ड नाही बँक पास बुक नाही यामुळे शासनाच्या योजनेचे लाभार्थी ठरू शकत नाही.आज देश असलेल्या लॉकडाउन कारणांमुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तरी परिस्थितिचे गांभीर्य लक्षात घेता त्यांना जीवनावश्यक वस्तुंची तात्काळ मदत मिळावी. असे निवेदन चाळीसगांव चे तहसीलदार अमोल मोरे यांना देण्यात आले.यावेळी पीपल्स सोशल फाऊंडेशन अध्यक्ष- आकाश पोळ,व संघटक-हर्षल माळी यांनी प्रतिनिधी स्वरूपात दिले