राज्यात सरसकट लॉकडाऊन न लावता वीकेण्ड लॉकडाऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
मुंबई(वृतसेवा)-तातडीने घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत,त्यात राज्यात सरसकट लॉकडाऊन लावता न लावता वीकेण्ड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आला. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य मंत्रिमंडळाची रविवारी दुपारी अत्यंत तातडीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात सरसकट लॉकडाऊन न लावता वीकेण्ड लॉकडाऊन लावण्याचा निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत संपूर्ण राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात येणार आहे. तर उर्वरित दिवसांमध्ये देखील निर्बंध कडक करण्यात आलेले आहेत. मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था 50 टक्के क्षमतेने सुरू राहील असा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचबरोबर रिक्षा, खासगी वाहतूक यांच्यावर बंदी घालण्यात आलेली नाही, अशीही माहिती देण्यात आली आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित व्यवहार बंद राहतील. वीकेण्ड व्यतिरिक्त उर्वरित दिवसांसाठी नाईट कर्फ्यू लावला जाणार आहे. तर दिवसा जमावबंदी लागू असेल. मॉल्स, थिएटर, बार बंद ठेवले जातील. तर हॉटेल्समधून फक्त पार्सल सुविधा सुरू राहणार आहेत.