चाळीसगाव करांनो….
आज…3 मे…..
आपल्या जनता कर्फ्यु चा…तिसरा दिवस…
पहिले 2 दिवस 100 टक्के कर्फ्यु पाळल्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्य वाद…
….पण आज चा तिसरा दिवस देखील फार महत्वाचा आहे….
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी …
कोरोना चा…शिरकाव रोखण्यासाठी …
निर्धार करा..की,आपल्या तालुक्यात ,आपल्या शहरात ,आपल्या वार्डात,आपल्या गावात …. कोरोना ला घुसू द्यायचेच नाही .
म्हणून न डगमगता घरातच रहा ..
आज देखील कोणत्याही परिस्थितीत बाहेर निघणार नाही,
अशी मनाशी खूणगाठ बांधा .
बंधू भगिनींनो…
तुम्हाला अभिमानाची गोष्ट सांगतो की ,आपण पाळलेल्या जनता कर्फ्यु चा आदर्श घेवून राज्यात देखील नागरिकांनी स्वस्फुर्तीने ठिकठिकाणी कर्फ्यु चा निर्णय घेतला .
पुणे सारख्या शहराने देखील आपल्या चाळीसगाव च्या जनता कर्फ्यु पासून प्रेरणा घेवून तिथे देखील कर्फ्यु चा निर्णय घेतला आहे .
ही आपल्या साठी अभिमानाची गोष्ट आहे .
आज चा दिवस देखील 100 टक्के कर्फ्यु पाळावा .ही आपण सर्वांना कळकळीची विनंती करीत आहोत .
घरातच रहा…
सुरक्षित रहा ….
धन्य वाद….
खूप खूप आभार…
नाना बागुल (धर्मभूषण बागुल)
राष्ट्रीय संघटक:समता सैनिक दल
राष्ट्रीय प्रचारक:भारतीय बौद्ध महासभा