संपादक गफ्फार शेख
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
शहरात फक्त डास प्रतिबंधक फवारणीचे 2 वाहन असून एकूण 17 प्रभाग असून मागील दीड ते 2 महिन्यापासून अनेक प्रभागात तर डास प्रतिबंधक फवारणी झालेलीच नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
चाळीसगाव(प्रतिनिधी)- शहरात डांसाचा उच्छाद वाढल्याने पुन्हा जीवघेण्या डेंग्यू व मलेरिया सारख्या आजारांची भीती निर्माण झालेली आहे. डासाच्या त्रासामुळे चाळीसगावकरांची झोप उडाली आहे. दिनचर्येची कामे सोडून डासांचा बंदोबस्त करण्यात अनेकांना वेळ गमावावा लागत आहे.चांगल्या पाण्यात उत्पत्ती होणारी ही डेंग्यू डासाची प्रजात यंदा ओलावा व दमट वातावरण असल्याने पुन्हा तोंड वर काढत असून मोठ्या प्रमाणात बळावली आहे. आता पुढे उन्हाळ्यातील दिवसांमध्ये कुलरचा वापर वाढणार त्यामुळे देखील डासांचे प्रमाण अधिक वाढेल.यामुळे डेंग्यू मलेरिया व डासांमुळे होणाऱ्या संसर्गाचा उपद्रव उच्छाद वाढण्यापूर्वीच प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. मात्र, अद्यापपर्यंत नागरपालीकेकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे स्वच्छतेकडे दुर्लक्ष तर दुसरीकडे जनजागृतीचा अभाव असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.शहरात डास प्रतिबंधक फवारणी देखील केली जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे सायंकाळनंतर घर असो की कार्यालये कुठेही बसणे अवघड झाले आहे. कार्यालयीन कामकाजात डासांचा सर्वाधिक अडसर निर्माण झाला असून, डांसाचा बंदोबस्त लावण्यातच अर्धाअधिक वेळ द्यावा लागत आहे. यावर उपाय म्हणून परिसर स्वच्छ व धूर फवारणी करणे गरजेचे असल्याचे काहींचे मत आहे.शहरातील बहुतांश परिसरात डासांचा उच्छाद वाढल्याची स्थिती आहे. अनेक परिसरात डासांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे.स्वच्छतेकडे दुर्लक्ष सांडपाण्याच्या नाल्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्यामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.त्यामुळे नगरपालिका प्रशासनासह नागरिकांनी नाल्यांच्या व पाण्याची योग्य ती विल्हेवाट लावणे अनिवार्य झाले आहे.