अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे

चाळीसगाव(प्रतिनिधी)-दि 21 मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान निमित्त राज्य परिवहन चाळीसगाव आगारात इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जयहिंद टेक्निकल इन्स्टिट्यूट चे प्राचार्य रफिक मनियार,पत्रकार गफ्फार मलिक, ज्येष्ठ साहित्यिक रमेश पोतदार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आगाराचे आगार व्यवस्थापक संदीप निकम यांनी भूषविले.
प्राचार्य मणियार यांनी पवित्र कुराणातील संदेशांचा संदर्भ देत पाच महत्त्वाचे मुद्दे विशद करताना रोजा व नमाज पठणाचे महत्व पटवून देत कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात आगार व्यवस्थापक संदिप निकम यांनी आनंदाच्या व उत्साहाच्या रमजान सणानिमित्त सर्व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन करूणाभाव व दानभावनेचे महत्त्व विशद केले.
राज्य परिवहन चाळीसगाव आगारातील सर्व रोजेदार मुस्लिम बांधवांचा व प्रमुख अतिथींचा गुलाबपुष्प व टोपी देऊन सत्कार करण्यात आला. सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून हिंदू मुस्लिम ऐक्याचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते, कार्यक्रमासाठी यंत्र अभियंता श्रावण सोनवणे,विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा,कामगार अधिकारी राहुल शिरसाठ, कर्म-वर्ग अधिकारी प्रशांत महाजन,लेखाधिकारी अल्पेश सोलंकी, सुरक्षा अधिकारी कल्पेश सोलंकी यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक वाहतूक अधीक्षक किशोर मगरे, पाळी प्रमुख आनंदा साळुंखे, वाहतूक नियंत्रक किरण काकडे,रमेश राठोड,नितीन पाठक, तुषार महाजन,मोहम्मद अन्सारी, दिपक भोई, फरिद मुल्ला, उदय सोनवणे, आरिफ शेख,शफी शहा, हेमराज जाधव,सईद शेख भाऊसाहेब हडपे, शाकीर खान,सुरेश गायकवाड,अश्फाक खाटिक, जहीर काझी,जमीर पठाण,अल्ताफ शेख अरूण जाधव,दामू जाधव,ईकबाल खान, धनराज वाघ,मुन्ना शहा, किशोर मिस्तरी,गणेश सानप,मुस्ताक शेख यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांताराम पाटील यांनी केले.