भाजपा कार्यकर्ते उमेश करपे यांचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांना प्रश्न…
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव-भारतीय जनता पार्टी चे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जरेंडेश्वर कारखाना विक्रीत भ्रष्टाचार झाल्याचे पत्र केंद्रीय मंत्र्यांना लिहिले आहे यावर चाळीसगाव तालुक्यातील भाजपा चे कार्यकर्ते उमेश करपे यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना सोशल मीडियात पत्राद्वारे प्रश्न विचारत सहकार मंत्री असतांना चाळीसगाव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना मूळ किमती पेक्षा कमी किमतीत विकला गेला त्या वेळी गप्प का होते असा आरोप केला आहे
प्रिय चंद्रकांत दादास… काल आपण जरेंडेश्वर कारखाना विक्री संदर्भात केंद्रीय मंत्र्यांना पत्र लिहिलं आणि आज राज्यातील 54 सहकारी कारखाने विक्रीत भ्रष्टाचार झाल्याच दुसरं पत्र लिहिलं बरं वाटलं.. मग मला दोन प्रश्न पडलेत पहिला कि आपण ज्या अजितदादांनी जरंडेश्वर कारखान्यात भ्रष्टाचार केलाय त्याच अजितदादांबरोबर सकाळी ठीक 7.45 वाजता शपथ घेतलीत तेव्हा नव्हता का जरेंडेश्वर संकटात ? आपण मग दुसरं पत्र लिहिलं कि मागील दहा वर्षात राज्यातील 54 सहकारी कारखाने विक्रीत भ्रष्टाचार झालाय. मग आपण तर तुमच्या ,माझ्या पक्षाच्या सरकारात पाच वर्षे सहकार मंत्री होतात तेव्हा माझ्या तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना 80 कोटीचीं संपत्ती असताना देखील 39 कोटीत विक्री झाला तेव्हा गप्प का होतात ?हा प्रश्न भाजपाचा कार्यकर्त म्हणून हा प्रश्न कामगार पुत्र म्हणून विचारतोय |
या प्रकारचे प्रश्न सोशल मीडिया वर भाजपा कार्यकर्ते उमेश करपे यांनी विचरल्यामुळे भाजप प्रदेशअध्यक्ष यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे,खरोखर चाळीसगांव तालुक्यातील बेलगंगा साखर कारखाना विक्रीत जर भ्रष्ट्राचार झालं असेल तर तालुक्यातील नेते मंडळींची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे.