शासकीय कार्यालय 7 दिवस बंद ठेवण्याचा राज्य सरकारचा निर्णय?
मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
शासकीय कार्यालयात होणारी गर्दी पाहता प्रशासनाने आज मोठं पाऊल उचललं आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आता 7 दिवस सुट्टी मिळणार आहे. असा काही निर्णय शासनाने घेतला नसून ही अफवा आहे असे राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धव ठाकरेंनी कळविले आहे,
कार्यालय 7 दिवस बंद राहणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच, फिफ्टी-50 बेसेसवर काही प्रमाणात कामकाज करता येईल का? याबाबात विचार सुरू असल्याचंही उद्धव ठाकरेंनी सांगितलंय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची महत्वपूर्ण बैठक झाली. त्यामध्ये, लोकलसेवा आणि अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तर, पब्लीक ट्रान्सपोर्ट पूर्णपणे बंद करण्याचे शक्य नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. हातावर पोट असलेल्या गरिबांसाठी या सेवा महत्वपूर्ण आहेत. त्यामुळे, अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील, असे टोपे यांनी स्पष्ट केले.
मात्र शासकीय कर्मचारी यांचा आनंद मात्र क्षणिक ठरला ,