दौंड(दि 26 एप्रिल):-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य सरकारच्या संयोगाने नवनवीन उपयोजना राबवत असताना काही नागरिकांना याचे गांभीर्य दिसत नाही असेच वाटू लागले आहे.श्रीगोंदा तालुक्यातुन दौंडमध्ये काही नागरिक प्रवेश करत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दौंड व श्रीगोंदा यांच्या संगनमताने निमगाव खलू येथे चेक पोस्ट उभारले असता पोलीस अहोरात्र कार्य करत असताना.पोलिसांना चकमा देऊन दौंड(सोनवडी)येथील भीमा नदिवरील बंधाऱ्यावरून काही नागरिक जीवघेणा प्रवेश करत लवकरात लवकर बंधाऱ्यावरील मार्ग बंद करण्यात यावा अशी मागणी तेथील ग्रामस्थ करीत आहेत.
दौंड प्रतिनिधी
पवन साळवे

