कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी मराठा महासंघाची निवेदनाद्वारे मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगाव (प्रतिनिधी)-दिनांक 29 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय मराठा महासंघाने चाळीसगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी असे निवेदन देऊन मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही संपूर्ण ऑगस्ट महिन्यात पावसाने हजेरी लावलीच नाही. यामुळे पीक सुकून पिके शेतकऱ्यांच्या हातात येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर कोरड्या दुष्काळाचे सावट उभे राहिले आहे. तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीची मदत करावी असे निवेदन अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे. सदरच्या निवेदनाची माहितीस्तव प्रत मुख्यमंत्री, कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनापाठवले आहे. सदरच्या निवेदनावर महिला जळगाव जिल्हासंघटक प्रतिभा पवार, चाळीसगाव तालुका महिला अध्यक्ष मीनल देशमुख, चाळीसगाव तालुका महिला संघटक सोनाली बोराडे, संगीता पाटील, शहराध्यक्ष खुशाल बिडे, युवक तालुका अध्यक्ष परमेश्वर पाटील, उपसरपंच जितेंद्र महाले आदी महिला व पुरुषांच्या सह्या आहे.