Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...
  • Tue. Jun 6th, 2023

ADHIKAR AAMCHA

Media News Portal

चाळीसगांव तालुक्यात ८ ते १० दिवसांचा जनता कर्फ्यु लागू करा, संभाजी सेनेची मागणी

Byadmin

Jul 24, 2020
1 0
Read Time2 Minute, 25 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून रोजच्या रोज कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे तरी भविष्यात हे प्रमाण जास्त वाढू नये म्हणुन लवकरात लवकर जळगांव भुसावळ अमळनेर प्रमाणे चाळीसगाव मध्येही अतिशय कडक आणी कठोर असा किमान ८ ते १० दिवसांचा जनता कर्फ्यु करण्यात यावा आणि त्या काळात विनाकारण रिकामचोट फिरणारांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी जनभावना झालेली आहे, जनतेला देखील वाटते आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यु आवश्यक आहे आणि म्हणूनच जनभावना लक्षात घेऊनच संभाजी सेना जनता आणि प्रशासन यांमध्ये एक माध्यम म्हणून जनतेच्या वतीने ही मागणी करीत आहोत.
तरी आमच्या चाळीसगावकर जनतेच्या आरोग्यासाठी अगदी लवकरात लवकर निर्णय घेऊन चाळीसगांव तालुक्यात किमान ८ ते १० दिवसांच्या जनता कर्फ्युचा निर्णय घेण्याची अंमल बजावणी करावी. अशी मागणी संभाजी सेनेने जिल्हाधिकारी जळगांव आणि उपविभागीय अधिकारी चाळीसगांव यांचेकडे निवेदनाव्दारे केली असून निवेदनावर संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ पाटील, तालुका अध्यक्ष गिरीश पाटील, शहर अध्यक्ष अविनाश काकडे,संदीप जाधव,लक्ष्मण बनकर,बंटी पाटील,कृष्णा पाटील, दिवाकर महाले,ध्यानेश्वर पगारे,सुनील पाटील,सचिन जाधव,सुरेश पाटील, सुरेश तिरमली,भय्यासाहेब देशमुख,तात्या ठोके, प्रवीण जाधव,बापूराव पाटील, राकेश पवार, रवींद्र शिनकर, प्रवीण पाटील आदींच्या सह्या आहेत.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!