दौंड शहर ठरतंय अपघाताचे केंद्रबिंदू,जबाबदार कोण?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव,मयूर साळवे
दौंड(प्रतिनिधी)-दौंड शहरात रोज दिवसातून दोन ते तीन अपघात होताना दिसत असल्याचे चित्र आहे.दौंड शहरात असे अपघात होत असल्याने आता मात्र दौंड शहरातील नागरिकांना जीव मुठीत धरून जगायची वेळ आली असून अश्या या अपघातांना आळा घालण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातील का? पहाण्याचा मुद्दा ठरेल.दौंड शहरातील गजानन सोसायटी लगत दौंड पाटस मुख्य रस्ता असल्याने वाहनांची गती जोरात असते व अश्या या हायवेवरील कामे लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याने मात्र ते होताना दिसत नाही ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामांमुळे एका नागरिकाला आपला जीव गमवावा लागला आहे अशी दबक्या आवाजात नागरिकांमध्ये चर्चा सुरू असल्याचे दिसून येत आहे
काल 11:30 वाजेच्या सुमारास हा दुचाकी स्वरांचा अपघात झाला असून या अपघातात एकाचा मृत्यू तर एक गंभीर असून ठेकेदाराच्या नियोजनशून्य कामांमुळे एका नागरिकाने आपला जीव गमावला आहे का?
कारण रस्त्यामध्ये ड्रेनेज चे काम चालू होते ते पूर्ण झाल्याने बँरकेट लावले होते मात्र त्यावर चालकाला दिसेल असे काही सिम्बॉल नसल्याने हा अपघात झाला असल्याचे नागरिकांकडून म्हटले जात असून जबाबदारी कोणाची ?अश्या या बेजबाबदार ठेकेदारावर कारवाई होणार का असा प्रश्न दौंडकरांमधून उपस्थित होतोय.