भाईगिरी कडे वळणारा तरुण वर्ग,अवैध धंद्यांची देन?
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)- शहरात वाढती गुंडगिरीचे कारण अवैध चालणारे धंदे,शहरात पत्त्यांचे क्लब,मटका व अवैध दारू विक्री युवकांना भाईगिरी कडे घेऊन चालली आहे का?
शहरात विविध ठिकाणी अवैध धंदे सर्रास पणे सुरू असून भाई बनण्याची चढाओढीत या कथित भाईंची अस्तित्वाची लढाई कायम सुरू असते छोट्या छोट्या, किरकोळ कारणांमुळे नेहमीच वाद विवाद होतात व पूर्वी सारख्या लाठ्या काठ्या न निघता तलवारी व आता देशी कट्टे निघायला सुरवात झाली असून नुसते निघत नाहीतर हवेत फायरिंग सुद्धा होते शहरात पूर्वी सुद्धा दोन गटात वादविवादात देशी कट्ट्याने फायरिंग झाली असून काल रात्री नागद रोड येथे दोन गटांच्या वादात पुन्हा देशी कट्ट्याने फायरिंग झाल्याची स्थानिकांमध्ये चर्चा आहे,मिळालेल्या माहिती नुसार संशयीता तपासा साठी ताब्यात घेतले असून तपास अंती सत्य बाहेर येणारच पन जर खरोखर फायरिंग करून अश्या प्रकारे शहरात दहशत निर्माण करून जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असेल तर खूप गांभीर्याने पाहण्याची गरज असून अवैध कट्टे शहरात येतात कसे या मागे रॅकेट तर नाही ना? याची पोलीस प्रशासनाने सखोल चौकशी करावी ही भाईगिरी थांबायला हवी अन्यथा भविष्यात याचे गंभीर परिणाम तर होणारच मात्र युवा वर्गाचे जीवन या भाईगिरी च्या नादात व्यर्थ जाणार यात मात्र शंका नाही, भाईगिरी थांबवयाची असल्यास अवैध धंद्यांना लागम लागायला हवी शहर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेत अश्या स्वतःला भाई समजणार्या भाईंना त्यांची लायकी दाखवत खाकीची ताकत काय आहे दाखवण्याची गरज आहे.