चाळीसगावात पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या वतीने जोडे मारो आंदोलन
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)- प्रतापगडावर दि ३० रोजी शिवप्रताप दिनाच्या कार्यक्रमात पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी हिंदीतून भाषण करताना औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून आग्रा येथे डांबण्यात आलं होतं. शिवाजी महाराज यांनी स्वतःसाठी नव्हे तर हिंदवी स्वराज्यासाठी तेथून सुटका करून घेतली. अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांना रोखण्याचे खूप प्रयत्न झाले.ज्या प्रमाणे आग्राच्या सुटकेतुन छत्रपती शिवाजी महाराज सुटले त्याच प्रमाणे शिंदेही बाहेर आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्राच्या सुटकेची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी करत अवमान कारक वक्तव्य केल्याने मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांमध्ये रोष व्यक्त होत असून वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान ठरवून केला जात असल्याचे यावरुन दिसत आहे.छत्रपती शिवाजी महाराजां विषयी अवमान कारक वक्तव्य पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केल्याने लोढा यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला सकल मराठा समाजाच्या वतीने दि १ डिसेंबर २०२२ रोजी चाळीसगाव येथील तहसील कार्यालया समोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची खिल्लत नाकारल्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने नजरकैदेत ठेवले होते एक वेळ मौत पतकरु मात्र अवमान नाही असा गर्भित इशाराच रामसिंग यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला होता.असे असताना इतिहासाचा अभ्यास नसताना पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पकडून नेले असे बेताल बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी तुलना करून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणे हा आदर्श नसून हा महाराष्ट्राचा द्वेष आहे हे हिंदुत्व नाही व पुन्हा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमीकाव्याची तुलना मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाशी केले भाजप शिंदे गटाला उदाहरण देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नावच दिसते काय ,छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गौरवासाठी न वापरता अवमान करण्यासाठीच वापरले जाते हे ठरवून षंढयंत्र केले जात असून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान वारंवार केला जात असल्यामुळे महाराष्ट्रात अवमान कारक वक्तव्यांमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड रोष आहे.या अगोदर राज्यपाल भगतसिंग कोशारी ,भाजप चे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी ,आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अवमान शिवभक्त कदापि सहन करणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला.अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या वतीने दि १ डिसेंबर २०२२ रोजी जोडे मारो आंदोलन करण्यात आले, सदरचे आंदोलन रयत सेना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. आंदोलनात छोटु अहिरे ,संजय कापसे, खुशाल बिडे,खुशाल मराठे, एड राहुल जाधव, योगेश पाटील, भाऊसाहेब पाटील, मुकुंद पवार, भरत नवले, स्वप्नील गायकवाड, राजेंद्र पाटील, दीपक देशमुख, गोपाल पाटील,विकास पवार,नामदेव तुपे,संजय पाटील,मोतीराम मांडोळे अदि सहभागी झाले होते