३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने
Read Time1 Minute, 12 Second
मुबंई-दि 26:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे व हातावर पोट असणाऱ्या नागरिकांनी उपाशी पोटी राहू नये व काही अडचणी निर्माण होऊ नये यासाठी राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून १ कोटी ५३ लाख ६४ हजार शिधापत्रिकाधारकांना ६५ लाख ५५ हजार क्विंटल अन्नधान्याचे वाटप. ५ कोटी ८६ लाख ३३ हजार लोकांना २९ लाख ३१ हजार ६५० क्विंटल तांदळाचे मोफत वाटप. कोविड१९ संकटावरील उपाययोजनेसाठी ३ कोटी ८ लाख ४४ हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना मे व जून महिन्यांसाठी प्रति व्यक्ती ५ किलो धान्य सवलतीच्या दराने देण्याचा निर्णय. २४ एप्रिल पासून २८ हजार क्विंटल धान्याचे वाटप-छगन भुजबळ-अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री