शिवसेनेचा धडक मोर्चा,शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चर्चा।
चाळीसगाव- आज दिनांक २५रोजी चाळीसगाव तालुका शिवसेने तर्फे कृषी उत्पन्न बाजार समिती ते तहसीलदार कार्यालय चाळीसगाव परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्या साठी प्रति हेक्टर २५००० रु मदत त्वरित मंजूर व्हावी,ज्या शेतकऱ्यांचे पीकविमा आहे त्यांना त्वरित पीकविमा मिळावा,बँकांनी शेतकार्यावरील कर्जकपात करू नये,राज्यपालांनी जाहीर केलेली आर्थिक मदत त्वरित शेतकऱ्यांना बँक खात्यात मिळावी अश्या अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदार साहेबांना देण्यात आले.
या वेळी तालुका संपर्कप्रमुख प्रकाश वाणी, उपजिल्हाप्रमुख महेंद्र पाटील, तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, विधानसभा क्षेत्रप्रमुख भीमराव खलाने, रोहिदास पाटील, प्रवक्ता दिलीप घोरपडे, तालुका संघटक सुनील गायकवाड, शेतकरी सेना तालुकाप्रमुख संजय संतोष पाटील, धर्मा खंडू काळे, नंदकिशोर बाविस्कर, संजय ठाकरे, तुकाराम पाटील, हिंमत निकम, सुरेश पाटील, जगदीश महाजन, अनिल राठोड, अण्णा पाटील, सुभाष राठोड, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठल पवार, सुनील किरण घोरपडे, विलास शिंदे,प्रभाकर दिनेश घोरपडे, दिलीप पाटील, शैलेंद्र सातपुते, कुमावत, अनिल पाटील, सचिन ठाकर, अनिल राठोड, वसीम शेख, संदीप पाटील, सागर पाटील, गोपाल परदेशी, दिलीप राठोड, नंदू गायकवाड, पांडुरंग बोराडे, गणेश भवर, संतोष गायकवाड, गोपाल पाटील, सचिन गुंजाळ, अनिल कुठे, दिनेश विसपुते, राजू शेळके, सुमित शेळके, शुभम शिंदे, अमोल चौधरी, रवींद्र चौधरी, सुनील पवार, बापू आगवणे आदी उपस्थित होते.