समाजसुधारक विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
मोरांबा ता अक्कलकुवा( जि नंदुरबार )-आज प्राथमिक आरोग्य केंद्र मोरांबा ता अक्कलकुवा जि नंदुरबार येथे समाजसुधारक विचारवंत महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारतीय समाज सुधारणेत महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा मोलाचा वाटा आहे. या सर्वांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव अग्रणी येते. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली. क्रांतीसूर्य महात्मा फुले हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज संस्थेची स्थापना केली. त्याआधारे शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. १८८८ मध्ये जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती. ‘शेतकर्यांचे आसूड’ हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिला होता.आजही त्यांचे विचार प्रेरणादायी आहे प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यावा असे आवाहन डॉ प्रमोद सोनवणे यांनी केले
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रमोद सोनवणे, औषधनिर्माण अधिकारी सचिन अग्रवाल, श्रीमती एस डी गावीत, श्रीमती वसावे, श्री राजू पठाण, क्लर्क श्री पवार , श्री ज्ञानेश्वर रोकडे , श्री अजिनाथ साबळे, श्री शरद जाधव,श्री रवि गायकवाड आदी उपस्थित होते.