ऋषीपांथा पुलासाठी 20 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे सादर,लवकरच मंजुरी मिळणार….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)-धार्मिक तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र ऋषिपांथा बहाळ येथील अरुंद व कमी उंचीच्या पुलाची नव्याने उभारणी करण्यासाठी शासनाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 20 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला आहे. यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते रामलाल चौधरी यांनी देखील मागील महिन्यात ऋषीपांथा नवीन पुल होणेबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. पुलाच्या कामासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधींनी देखील वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न व पाठपुरावा केला आहे. त्याचप्रमाणे गावातील काही सामाजिक कार्यकर्ते व सर्व क्षेत्रातील नागरिकांचे योगदान लाभत आहे. मेडलाईफ फाउंडेशनचे संदीप शिरोडे यांनी देखील या कामासाठी पाठपुरावा केला आहे. एकत्रित सगळ्यांनी प्रयत्न केल्यास निश्चितच येणाऱ्या मार्च अखेर सदर पुलाच्या कामास मंजुरी मिळू शकते.अशी माहिती देखील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली आहे. राजकीय हेवेदावे बाजूला सारून सदर पुलाच्या कामासाठी ग्रामस्थांनी एकवटून हे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या कामासाठी लोकप्रतिनिधींनी जर का तातडीने प्रयत्न केला तर, येणाऱ्या मार्च अखेर नवीन पुलाच्या कामास गती मिळू शकते.