ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
निवेदनाद्वारे मा. वर्षाताई गायकवाड, शालेय शिक्षण मंत्री यांना केली आहे,ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे अशी मागणी डॉ कुणाल खरात( प्रदेश अध्यक्ष)महाराष्ट्र राज्य AIMIM विद्यार्थी आघाडी यांनी केली आहे
कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत व कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न येता ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे. या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून सिलाबस बुडाला तर त्यास विद्यार्थी जबाबदार राहतील असे तोंडी सांगत आहेत .अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी आवश्यक असलेले साधने उपलब्ध नसल्याने शिक्षणाला मुकावे लागत आहे , कोरोना महामारीच्या काळात अगोदरच अनेक पाल्यांच्या पालकांचे रोजगार बुडाले असून त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत असून पालकांचे कंबरडे मोडलेले आहे , ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना मोबाईल,टॅब,लॅपटॉप व ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे साधने घेण्यासाठी हट्ट करीत आहेत . जे सधन घरातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयीच्या समस्या निर्माण होत असून मान, कंबर, मणका ,डोळे,खांदा, मनगट दुखीच्या समस्या मोठया प्रमाणात विद्यार्थ्यांना होत असून पालक हया समस्यांमुळे त्रस्त झाले आहेत. आपन ऑनलाईन शिक्षणाला मुकणार म्हणून अनेक विद्यार्थी नैराश्यामधे जात आहे , त्याचाच एक भाग म्हणून काल बीड जिल्ह्यातील गेवराई येथील इयत्ता दहावीत शिकणार्या अभिषेक संत हया हुशार व होतकरू विद्यार्थ्याने ऑनलाईन शिक्षणासाठी टॅब न मिळाल्याने आत्महत्या केली आहे, सदरील बाब ही गंभीर असून शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण घेणारे श्रीमंत विद्यार्थी व ऑनलाईन शिक्षणासाठी साधने नसलेेेले गरीब विद्यार्थी असा भेदभाव निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था तयार होते आहे . जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकत आहेत अशे विद्यार्थी नैराश्यामधे जाऊन आजारी पडण्याच्या तक्रारी सुद्धा पाहायला भेटत आहेत . शिक्षण विभागाच्या सर्वेनुसार राज्यातील विद्यार्थ्यांची सध्याची स्थिती राज्यात स्मार्ट फोन असणारे विद्यार्थी ४३.६३% ,साधा मोबाईल असलेले विद्यार्थी ३०.७४% ,मोबाईल उपलब्ध नसलेले विद्यार्थी २६.११% , टि.व्ही. ची सुविधा उपलब्ध असलेले विद्यार्थी ६५.०३% , रेडिओ उपलब्ध असलेले विद्यार्थी १०.७८% , आणि कोणतीही सुविधा उपलब्ध नसलेले विद्यार्थी १५.६०%. आता शिक्षण विभागाने सांगावे आपन किती विद्यार्थ्यांना त्यांच्या मुलभुत शैक्षणिक अधिकाराला त्यांना मुकवणार आहात . आणि काही शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास अटेंड केले नाही तर झालेल्या शैक्षणिक नुकसाला विद्यार्थी जबाबदार राहतील असे सांगत आहेत. ज्यामुळे अनेक विद्यार्थी तनावाखाली जगत आहेत. जो पर्यंत सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान शिक्षण उपलब्ध होत नाही व सरकार योग्य ती योजना आखत नाही तो पर्यंत ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे. देशाचे भविष्य असणार्या हया विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये व शैक्षणिक अधिकारापासून कुठलाही विद्यार्थी वंचित राहू नये याची खबरदारी घेणे सरकार व प्रशासणाचे कर्तव्य आहे. कुठल्याही विद्यार्थ्यांने पुन्हां ऑनलाईन शिक्षणासाठी आत्महत्या केली तर त्या शिक्षण संस्थेतील जबाबदार व्यक्तींवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हे दाखल करावे व सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध होईल अशी यंत्रणा निर्माण करावी. तो पर्यंत ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे. अन्यथा गोर गरीब विद्यार्थ्यांच्या न्याय व शैक्षणिक हक्कांसाठी आम्हाला रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल डॉ कुणाल खरात( प्रदेश अध्यक्ष)महाराष्ट्र राज्य AIMIM विद्यार्थी आघाडी .