Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

जामडी येथील शेतकऱ्यांनी स्वखर्चातून बनविला शेतरस्ता,शासकीय मदतीची किंवा निधीची वाट न पाहता..

0
1 0
Read Time2 Minute, 52 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शहा

जामडी(चाळीसगाव)-दि 6 सध्या पाऊस भरपूर पडत असल्याने नद्या-नाले ओसंडून वाहत आहेत यामुळे नदीच्या गावाच्या शेतकऱ्यांना नदी-नाले ओलांडून आपला तयार झालेला शेतमाल बाजारात नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे, तर अनेकवेळा शेतमालाचे नुकसान देखील होत आहे ,दिनांक 5 सप्टेंबर रोजी हिवरखेडा येथील शेतकरी शिवदास जाधव यांचा आद्रक ने भरलेला ट्रॅक्टर अशाच पद्धतीने नदीच्या पाण्यात पलटी होऊन संपूर्ण कष्टाने कमावलेल्या आद्रक वाहून गेल्याने हा शेतकरी जागेवर बेशुद्ध झाला सदर व्हिडिओ अनेक ठिकाणी व्हायरल झाल्याने चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथील शेतकरी दिपकसिंग राजपूत,भगवान परदेशी ,अरुण जाधव, अनिल जाधव ,राजु परदेशी,सरदार परदेशी यांनी अशी वेळ आपल्यावर येऊ नये व आपल्याही शेतमालाचे नुकसान होऊ नये म्हणून आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी नदी सोडून जवळपास दीड किलोमीटर अंतराचा शेत रस्ता स्वखर्चातून बनविला असून यामुळे आता या शेतकऱ्यांना आपला शेतातील माल केळी,टमाटा, अद्रक इतर जो काय असेल तो सुरक्षितपणे शेतातून बाहेर आणून बाजारात विकायला नेता येणार आहे, कुठल्याही शासकीय मदतीची किंवा निधीची वाट न पाहता तयार केलेल्या या रस्त्यामुळे सदर शेतकऱ्यांचे गावात व परिसरात कौतुक होत आहे स्वतःच्या मालाच्या सुरक्षितेसाठी घेतलेली ही काळजी कौतुकास्पद असून यामुळे शेतकऱ्याला आपली मेहनत पाण्यात जाणार नाही याचे समाधान होईल बऱ्याच वेळा शेतकऱ्याचे नुकसान झाल्यानंतर पंचनामे होतात सोपस्कार पार पाडले जातात मात्र मदत हवी तशी वेळेवर हातात पडत नाही म्हणून आम्ही स्वतः आमचा रस्ता तयार केला असे जामडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रगतिशील शेतकरी दीपकसिंग राजपूत यांनी बोलून दाखविली आहे

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: