जिल्हा दौरा वरील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी शिक्षण व शिक्षकांना दिलासा द्यावा शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांची मागणी
जळगांव: उद्या दिनांक 15 रोजी दुपारी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर पहिल्यांदा दुपारी जळगाव शहर व जिल्ह्यात आयोजित कार्यक्रम निमित्त येत असून त्यांनी जिल्ह्यातील जवळपास आठ तालुक्यांना गटशिक्षण अधिकारी पदे रिक्त असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी पद रिक्त आहे ही पदे शैक्षणिक दृष्ट्या तातडीने भरण्याची गरज आहे.जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक पदे रिक्त आहेत ही पदे तात्काळ भरावीत त्याच जोडीने राज्य शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणासंदर्भात सर्व शिक्षक संघटनांना व शिक्षकांना विश्वासात घेऊन अभ्यास गट स्थापन करून अभ्यास गटाद्वारे स्वतंत्र ई-मेल व फेसबुक पेज सर्व शिक्षकांसाठी बदली धोरण कसे असावेत प्रस्तावित सुधारणा काय व त्याचे फायदे काय यासाठी मते मांडण्यासाठी सुरू केल्याबद्दल स्वतंत्र फेसबुक पेज व ईमेल आयडी विकसित करून आदर्श शिक्षक बदली धोरण बनविण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतल्याबद्दल राज्य शासन,ग्रामविकास व शालेय शिक्षण विभागाचे एका पत्रकाद्वारे अभिनंदन करून राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्य समन्वय समितीचे वतीने शिक्षण विभागाचे अधिकारी, केंद्र प्रमुख,व इतर सर्व रिक्त पदे भरण्यात यावी अशी मागणी राज्य समन्वयक किशोर पाटील कुंझरकर यांनी राज्य समन्वय समितीच्या वतीने केली आहे.व लक्ष वेधले व दिलासा द्यावा असे म्हटले.