पद्मदुर्ग किल्ल्यावर देशातील सर्वात उंच भगवा लावण्याचा आनंद सह्याद्री प्रतिष्ठान तर्फे साजरा
चाळीसगाव(प्रतिनिधी): आज दि २७/१२/२०१९
रोजी
सह्याद्री प्रतिष्ठान या गड किल्ले संवर्धनाची चळवळ राबविणाऱ्या संघटनेने रायगड जिल्ह्यातील समुद्रात जंजिरा किल्ल्याच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या पद्मदुर्ग किल्ल्यावर दिनांक २६ डिसेंबर रोजी देशातील सर्वात उंच भगवा ध्वज कायमस्वरूपी उभारून किल्ल्याच्या वैभवात भर घातली असून समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांना किल्ल्यावर जाण्यासाठी आकर्षित करण्याचे काम परम पवित्र भगवा कायमस्वरूपी करेल हा भगवा ध्वज उभारण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान ने गेल्या वर्षभरापासून काम हाती घेतले होते.ते दिनांक २६ डिसेंबर रोजी पूर्णत्वास गेल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सह्याद्री प्रतिष्ठानच्या दुर्ग सेवकांनी आपल्या शहरांमध्ये फटाके फोडून व पेढे वाटून आनंद साजरा केला व सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे आणि सहभागी सर्व दुर्ग सेवकांचे अभिनंदन करण्यात आले .यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे उत्तर महाराष्ट्र प्रमुख,शुभम चव्हाण ,अजय जोशी ,योगेश शेळके, दिपक राजपूत ,गणेश पाटील, रामलाल मिस्तरी ,पप्पू राजपूत, दिनेश घोरपडे ,रवींद्र दुशिंग ,वाल्मीक पाटील, जितेंद्र वाघ ,सचिन पाटील ,राहुल पवार ,दिलीप बोराडे ,आकाश चव्हाण ,आकाश शेळके, रवींद्र मोरे सुनील कोळी ,सागर पांचळ,सचिन घोरपडे ,अजय घोरपडे सोहम येवले ,तेजस गुंजाळ ,निलेश गुंजाळ ,सचिन देवरे ,रोहित गुंजाळ,प्रशांत जाधव,अतिश कदम उपस्थित होते.