शहर विद्रुपीकरण थांबवा संभाजी सेनेच्या ठिया आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक बॅनर मुक्त
चाळीसगाव(प्रतिनिधी): संभाजी सेनेने चाळीसगाव शहरात होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील विद्रूपीकरण याबाबत छत्रपती शिवाजी महाराज चौकांमध्ये विविध जाहिरातींचे वाढदिवसाचे अनेक कार्यक्रमांचे फलक लावून शहर विद्रुपीकरण केले जाते आणि त्यात भर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौकात होऊ घातलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी सध्या काम सुरू असलेले शिवसृष्टी चे काम सुरू आहे त्यावर देखील विविध कार्यक्रमांचे बॅनर लावून जाहिरातबाजी सुरू झालेली आहे तरी ही बॅनरबाजी तात्काळ रोखावी म्हणून संभाजी सेनेने आज दिनांक २७ डिसेंबर रोजी चाळीसगाव नगरपालिका प्रशासनास एक तासाची मुदत देत सदर सर्व बॅनर पोस्टर न काढल्यास ठिय्या आंदोलन करणार असा इशारा दिल्याने नगरपालिका प्रशासन खडबडून जागे झाले व लागलीच छत्रपतीशिवाजीमहाराज चौकातील वाढदिवसाचे तसेच विविध हॉटेलच्या जाहिरातींचे व काही कार्यक्रमांचे लागलेले बॅनर काढून चौक बॅनर मुक्त केला यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक पुन्हा एकदा मोकळा श्वास घेऊ लागल्याचे दिसून आले विशेष म्हणजे ज्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची शिवसृष्टी उभारली जात आहे येथेही काही महाभागांनी बॅनर लावल्याचे दिसून आल्याने संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण शिरसाठ यांनी संताप व्यक्त केला असा प्रकार पुन्हा कधीही खपवून घेतला जाणार नाही असा इशारा यावेळी दिला शहराचे होणारे विद्रुपीकरण थांबवण्यासाठी संभाजी सेनेने केलेले हे अनोखे आंदोलन चाळीसगाव करांचा कौतुकाचा विषय होत आहे या वेळी संभाजी सेनेच संस्थापक अध्यक्ष
लक्ष्मण बापु शिरसाठ, सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप घोरपडे , अविनाश काकडे, ज्ञानेश्वर पगारे,रवींद्र शिनकर,बंटी पाटील,कृष्णा पाटील,लक्समन बनकर घनश्याम सोनार,राकेश पवार, दिवाकर म्हणाले, राकेश जोशी,आधार महाले,गणेश वाघ,सुनील पाटील, सचिन जाधव, गोपीनाथ घुगे,संदीप जाधव,कुणाल आराक, विजय सगळे, गणेश गीते, अशोक देवरे, सुरेश पाटील, भैय्यासाहेब देशमुख, सुयोग नरवाडे, सुरेश तिरमली आदी उपस्थित होते.