मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक भावना दुखवणार्या वसीम रिजवी वर गुन्हा दाखल करावा
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शिया बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी कुराण या मुस्लिम समाजाच्या पवित्र धर्मग्रंथातील 26 आयात बदल करण्याची मा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली व प्रसार माध्यमातून बोलतांना कुराण व सुरवातीच्या 3 खलीफा विरुद्ध खोटे व बिनबुडाचे आरोप लावले आहेत
दि.11/03/2021 रोजी लखनऊ उत्तर प्रदेश येथील राहणारे शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करून जगभरातील सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुराण शरीफ मध्ये बदल करून त्याच्यात असलेले 26 आयात (sentence) वगळण्यात यावी अशी मागणी केली. त्याच्या या याचिकेला सुप्रीम कोर्ट अँडमिट न करता फेटाळून लावतील यात शंका नाही. मात्र एका पत्रकाराशी बोलतांना इस्लाम धर्माचे तिन्ही खलिफा व पवित्र कुराण संबधी आक्षेपार्ह भाषेचा उपयोग करुन दूषप्रचार करून इस्लाम धर्माची छवी मलीन करण्याचे काम त्यांनी केले आहे ज्यामुळे सर्व मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल आम्ही वसीम रिजवी याच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दाखल करीत आहे. तरी वसीम रिजवी विरुद्ध भा.द.वि.ची कलम २९५ व आयटी. ॲक्ट.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदन द्वारे तहसीलदार अमोल मोरे व पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड यांना करण्यात आली आहे.
या वेळी डॉ शोहेब युनूस खान,मंजूर हाजी,अज्जू मिर्जा,अझहर मुजावर,अरबाज खान(फिटर),मंजूर हाजी,इम्रान खान,साहिल खान आदी उपस्थित होते.