यशस्विनी सामाजिक अभियान व प्रतिभा फाउंडेशन पुणे तर्फे 200 कामगारांना जेवण वाटप
दौंड:(पवन साळवे)संपूर्ण जगात कोरोना या विषाणूचे वाढते रुग्ण लक्षात घेता भारत सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संगनमताने लॉकडाऊन घोषित करण्यात आला व महाराष्ट्र राज्यात आर्थिक संकट ओढवले आहे कमागरांचे हातचे काम बंद झाले व काही ठिकाणी प्रवासी अडकले आहेत त्यांच्या जेवणाची चणचण भासत आहेत दौंड मधील अश्याच काही सामाजिक संघटनेने फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपापल्या परीने त्यांच्या जेवणाची व्यवस्था करत आहेत.त्याच अनुषंगाने यशस्विनी सामाजिक अभियान व प्रतिभा फाउंडेशन पुणे यांच्यावतीने आज दौंड शहरातील संत तुकडोजी विद्यालय येथे करोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तसेच जिल्हाबंदी आदेशामुळे बीड व परभणी जिल्ह्यातील अडकून पडलेल्या ऊसतोड (200) कामगारांना भोजनाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रतिभा फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ. वैशालीताई नागवडे, सौ .सीमाताई पाटोळे ,अनील नागवडे, निखील स्वामी, जयंत निकम, विक्रम साबळे,तात्या शितोळे, शोभराज थोरात इत्यादी मान्यवर उपस्थित होते.