अखेर तो बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात कैद….
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गाफ्फार मलिक(शेख)
चाळीसगांव(प्रतिनिधी)-तालुक्यातील मुंदखेडे बुद्रुक येथे पंधरा दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाने केला पिंजऱ्यात कैद नागरिकांनी घेतला सुटकेचा निस्वास.
शेतकरी निंबा पाटील व गोकुळ पाटील यांच्या शेतातील 3 जनावरांचा फडश्या या बिबट्या ने पडला होता या मुळे संपूर्ण गावात दहशत पसरली होती पंधरा दिवसांपासून गावातील नागरिक भयभीत होते मात्र वन विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देत आपले कार्य सुरू केले होते पिंजऱ्यात बोकड लावून तब्बल 15 दिवसांनी दि 5 ऑगस्ट शुक्रवारी पहाटे बिबट्यास पकडण्यास वनविभागास यश आले.
बिबट्या जाळ्यात अडकण्यासाठी त्यात बोकड बांधण्यात आले,बिबट्या पिंजऱ्यात अडगताच त्यानंतर भयभीत नागरिक वा शेतकऱ्यांनी सुटकेचा निस्वास सोडला,उप वनसंरक्षक यांच्या आदेशाने त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
सदर मोहीम जिल्हा वन संरक्षक विवेक होसिंग , सहा वनसनरक्षक एस . के . शिसव , जळगाव , मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी शितल नगराळे यांच्यासह सहकारी विवेक देसाई वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे , वनपाल जी . एस . पिंजारी , आर . वी . चौरे , वनरक्षक एस . बी . चव्हाण , आर . बी . पवार , आर . आर . पाटील , वाय . के . देशमुख , के . बी . पवार , एम . पी . शिंदे , अश्विनी ठाकरे , वन बाळू शितोडे , श्रीराम राजपूत , भटू पाटील , संजय दे राहुल मांडोळे , संजय गायकवाड या पथकाने फत्ते करून दाखवले . याबाबत वनविभागाचे नागरिकांमधून आभार मानले जात आहे.