Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

केळी पिकांचे (सन २०१९-२०) वादळ व गारपीटमुळे झालेल्या नुकसानाच्या भरपाईची रक्कम तातडीने द्यावी. अन्यथा शेतकऱ्यासमवेत रस्त्यावर उतरण्याचा खासदार उन्मेश पाटील यांचा कृषी सचिवांना इशारा.

0
0 0
Read Time2 Minute, 36 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

उपसंपादक रोहित शिंदे

जळगाव – हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन २०१९-२० अंतर्गत केळी या पिकाचा विमा शेतक-यांनी काढलेला असून मी वरील संदर्भीय पत्रान्वये आपणाकडे यापूर्वीच 11 नोव्हेंबर 2020 रोजी नुकसान भरपाईची रक्कम तात्काळ शेतक-यांच्या बँक खात्यात वर्ग होणेबाबत मागणी केली होती. त्याअनुषंगाने संबंधीत विमा कंपनीने दि.०७/१०/२०२० पासून शेतक-यांना केळी पिक विमा मधील तापमानाची रक्कम (कमाल व किमान तापमानाची) रक्कम वर्ग केलेली आहे. परंतु जळगाव जिल्हयात माहे – मार्च २०२० कालावधीत झालेल्या वादळी पाऊस व गारपीटमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झाले होते. सदरील योजनेत शेतक-यांना वादळ व गारपीटीने पिकाचे झालेल्या नुकसानाकरीता देखील विमा सरंक्षण लागु आहे.परंतु वादळ व गारपीटीने पिकाचे झालेल्या नुकसानीच्या भरपाईची रक्कम अद्यापही शेतक-यांना मिळालेली नाही. तरी शासन निर्णयाच्या अनुषंगाने विमा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत सदरील रक्कम शेतकऱ्यांचा खात्यात जमा करणे बंधनकारक असून आज सहा ते सात महिन्यानंतर देखील सदरील रक्कम जमा झालेली नसून शेतकरी तीव्र रोष व्यक्त करीत आहेत. मी आपणास या पत्राद्वारे विनंती करतो की आपण तातडीने या बाबत कार्यवाही करीत संबधित शेतकऱ्यांना १२ टक्के विलंब शुल्कासहित या महिन्याअखेर नुकसान भरपाई मिळवून द्यावी अन्यथा मला स्थानिक शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. तरी आपण सदरील नुकसान भरपाईचे तात्काळ आदेशीत करावे. अशी मागणी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी कृषी सचिवांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: