घाटात सापडलेल्या ‘त्या’ अज्ञात व्यक्तीचा खून,ग्रामीण पोलिसांनी लावला खुनाचा तपास…..
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
फक्त ५ हजारावरून मेहुण्याने व मित्राने केला खून – चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनकडून गुन्हा उघडकीस
चाळीसगाव ; कन्नड घाटात ऑगस्ट महिन्यात २९ तारखेला जय मल्हार पॉईंटजवळील दरीत अज्ञात व्यक्तीचा मुतदेह आढळून आला होता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने जागीच शवविच्छेदन करण्यात आले होते. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
करण्यात आली आहे. या प्रकरणाचा चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी छडा लावला असून अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याचे निष्पन्नात आले आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, चाळीसगाव कन्नड घाटात जय मल्हार पॉईंटजवळील दरीत ता. २९ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी सदरील व्यक्तीचा फोटोचा फोटोग्राफर कडून फोटो डेव्हलपरच्या साह्याने चेहरा समजेल असे बनविले नातेवाईकांना असलेला घातपाताचा संशय व मयताचे कपडे यावरून पोलिसांना मयत व्यक्तीची ओळख पटविता आली. सदरील व्यक्ती मधुकर रामदास बुटाले (वय ४५) रा. न्यायनगर औरंगाबाद येथील रहिवासी आहे. ता.२७ ऑगस्ट रोजी मयताचा मेहुणा – गोपाल शंकर पंडित व मित्र कृष्णा रामदास भोसले,दोघे राहणार औरंगाबाद हे मधुकर बुटाले सोबत औरंगाबाद येथील रामगिरी हॉटेल येथून गोपाल पंडित याच्या रिक्षा क्र. एमएच २० ईएफ ७९८४ ह्यात बसून सावित्रीनगर मार्गे वरुड गावी जात असताना ५ हजार देण्याच्या वादावरून कृष्णा भोसले व मयत मधुकर बुटाले यांच्यात चिकलठाणा पोलीस स्टेशन हद्दीत वरुड गावाजवळ रिक्षातच भांडण झाली यात कृष्णा भोसले याने मधुकर बुटाळेचा गळा दाबून खून केला. मधुकर मेल्याचे निष्पन्न होताच त्याला कन्नड घाटातील जय मल्हार पॉईंट जवळील दरीत फेकून दिले. ता.२९ ऑगस्ट रोजी वनविभागाच्या कर्मचाऱ्यास कुणीतरी मयत असल्याचे दिसून आले. त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अज्ञात मृतदेहाची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी तपासचक्रे फिरवीत संशयित दोघांना विचारपूस केली असता त्यांनी सुरुवातीला उडवा उडवीची उत्तरे दिले नंतर त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर खून केल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी मधुकर यांच्या दोघा मारेकऱ्यांना दि ३० रोजी ताब्यात घेतले असून सदरील गुन्ह्याचा तपास सहापोनिरी हर्षा जाधव हे करीत आहे.
चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणलेल्या खुनाच्या गुन्ह्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.