जनता कर्फ्यु असताना देखील दौंड नगरपालिकेच्या वतीने पाणी सोडले जात आहे
दौंड(प्रतिनिधी)-प्रभाग क्रमांक-1 नवगिरे वस्ती.दौंड नगरपालिकेच्या वतीने कोरोणावर जनजागृती केली जातेय परंतु आज जनता कर्फ्यु असताना देखील दौंड नगरपालिकेच्या वतीने पाणी सोडले जात आहे घरात बसून जनता कर्फ्यु चे पालन करण्याऱ्या सामान्य जनतेला खुद्द नगरपालिका बाहेर येण्याचे आमंत्रण देत आहे.कोरोणा व्हायरसवर मात करण्यासाठी जनता कर्फ्यु चा प्रशासन किती गांभीर्याने विचार करत आहे हे दिसून येत आहे उपाययोजना ह्या प्रत्यक्षात असाव्यात कागदोपत्री नसाव्यात असे काही नागरिक राग व्यक्त करत आहे.दौंडच्या जनतेच्या जनतेच्या आरोग्याची काळजी दौंड नगरपालिका घेणार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय शुक्रवार,शनिवार या दिवशी कॉल करून देखील पाणी सोडण्यात आले नाही असे येथील नागरिक सांगत आहे.जनता कर्फ्युच्या दिवशीच पाणी सोडण्याचे कारण काय?