३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई: कोरोना व्हायरसमुळे 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. 31 मार्चपर्यंत सर्व राज्यातील शाळा, कार्यालये व इतर संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गटात एकत्र येऊ नयेत यासाठी सरकार सूचना देत आहेत.आता संसर्गाची झपाट्याने वाढणारी घटना लक्षात घेता,संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदा हा मोठा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिजिटल प्रेसव्दारे हि माहिती दिली.
कोरोना व्हायरसची प्रकरणे जगभरात झपाट्याने वाढत आहेत. अहवालानुसार हा विषाणू 170 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे आणि यामुळे आतापर्यंत 11 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे तीन लाख लोकांना याचा संसर्ग झाला आहे. भारतातही त्याच्या संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. आतापर्यंत 341 लोकांमध्ये या विषाणूची पुष्टी झाली आहे.
आज (रविवारी) दुपारपर्यंत 26 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘लाईव्ह’ प्रसारणातील महत्वाचे मुद्दे आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू आपण आता अधिक पुढची पावले टाकत आहोत. सर्वात कठीण काळ आता सुरु झालं आहे. जी जिद्द आज आपण दाखविली आहे ती पुढे पण दाखवा. ही आपली खरी परीक्षा आहे. सरकार गंभीर आहे. आपणही सहकार्य करा. महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका. रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद करीत आहोत. जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील बँका, वित्तीय संस्था सुरूच राहतील शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थित राहतील. आज मध्यरात्रीपासून सर्व जगातून येणारी विमाने बंद करीत आहोत. ज्यांचे घरीच विलगीकरण केलेले आहेत त्यांच्या हातावर शिक्के आहेत. अशांनी कृपा करून १५ दिवस घराबाहेर पडू नका. आणि घरातल्या घरात सुद्धा वेगळे रहा. चाचणी केंद्रे आपण वाढवीत आहोत. ३१ मार्चच्या पुढे देखील गरज पडली तर निर्णय घेण्यात येईल सर्व प्रार्थनास्थळांवर पूजा अर्चा सुरु राहील पण भाविकांसाठी बंद अमेरिकेतल्या ट्रम्पपासून ते आपल्याकडच्या सरपंचांपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी अशी परिस्थिती पण माणुसकी बाळगा. कामगार-तात्पुरत्या आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या |