दौंडची जनता कोरोनाशी लढण्यासाठी सज्ज आहे आज या बंदच्या माध्यमातून दाखवून दिले.
दौंड(प्रतिनिधी):- दि 22 मार्च 2020 रोजी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी भारतीय जनतेला अहवाहन केले होते की पोलीस बांधव किंवा इतर प्रशासन कर्मचारी,पत्रकार,न पा कामगार व आरोग्य कर्मचारी जे आपल्या सेवेसाठी सकाळी ०७:००वा ते रात्री ०९:०० वाजेपासून कर्तव्य वर उपस्थित राहून चोख पणे आपली जबाबदारी पार पाडत आहे
त्यांचे आभार म्हणून सर्वांनी पाच वाजता आपापल्या बाल्कनी मध्ये टाळ्या आणि घंटी, ताट वाजवून अभिनंदन करायचे आहे असे सांगण्यात आले होते यावेळी दौंड येथे बालगोपालांनी सुद्धा टाळ्या,थाळ्या वाजवून आभार मानले व या सर्वांचा मान राखून जनतेने चांगला प्रतिसाद दिला व कोरोनाशी लढण्यासाठी भारतीय जनता सज्ज झाली हे दाखवून दिले.व कोरोना या महाभयानक विषाणूशी झुंज देणाऱ्या डॉक्टर्स व नर्सचे तसेच पोलीस प्रशासनाचे व सर्व प्रशासनाचे टाळ्या वाजवून आभार मानले व त्यांच्या प्रती उपकृत असल्याची भावना व्यक्त केली.