तीन चाकावरील चार भिंतीचा संसार कसा चालवावयाचा रिक्षाचालकांची आर्थिक मदतीची मागणी
दौंड(पवन साळवे दि 21):- दौंडमधील रिक्षाचालकांची मागणी . कोरोना संकटामुळे रिक्षा बंद ठेवाव्या
लागल्यामुळे “तीन चाकावरील चार भिंतीचा संसार” कसा चालवावयाचा असा प्रश्न रिक्षा चालकांपुढे निर्माण झाला आहे.हातावर पोट असलेल्या रिक्षा चालकांना दिल्ली सरकारप्रमाणेच प्रत्येकी रु.५०००/- आर्थिक मदत ‘मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून’ मिळावी.तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतून मोफत धान्य मिळावे.अशी मागणी शासनाकडे केली जावी अशा विषयाचे लेखी निवेदन मा .तहसीलदारसाहेब, दौंड, जि ,पुणे, यांचेकडे देण्यात आले.
दौंडमधील सामाजिक कार्यकर्ते व “रिक्षा चालक व मालक” या विषयावर पीएच.डी . केलेले प्रा.डॉ. भिमराव मोरे यांचे मार्गदर्शनाखाली साईराज रिक्षा संघटनेचे अध्यक्ष उत्तम लोंढे, श्रीनाथ म्हस्कोबा रिक्षा स्टॅन्डचे बाबा कोरी, गायकवाड रिक्षा स्टॅन्डचे माजी अध्यक्ष अनिल शिंदे,यांनी याप्रसंगी विशेष पुढाकार घेतला. व निवेदनावर स्वाक्षऱ्या
करून पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.