Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

दहा हजारांहून अधिक महिलांची उपस्थिती, हळदी कुंकू करत वाण भेट देऊन शिवनेरी फाउंडेशन तर्फे महिलांचे स्वागत…

0
0 0
Read Time8 Minute, 32 Second

संपादक गफ्फार शेख(मलिक)

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

चाळीसगाव(प्रतिनिधी)-  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणासाठी मोठ्या प्रमाणात योजना सुरू करण्यात आल्या आहेत. चाळीसगाव मतदारसंघात देखील २०१८ – १९ मध्ये बोटावर मोजता येतील एव्हडे बचत गट होते. आज २०२४ मध्ये ३२०० गटांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यात १०० कोटींचे बँक भांडवल उलाढाल झाली आहे. ही महिलाशक्तीची ताकद असून रुपयाला रुपया जोडत आपला संसार गाढा महिला भगिनी ओढतात. तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हे तर त्यांचा घरातील सदस्य म्हणून ज्या बचत गटातील व तालुक्यातील सर्वसामान्य घरातील मुलींच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी मी घेत असून येत्या तीन महिन्यांत भावदिव्य असा मोफत सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची घोषणा चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी केली.

ते चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे शिवजयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित बचत गट CRP व VO सन्मान शक्तीवंदन अभियान व शिवनेरी फाउंडेशन आयोजित हळदी कुंकू सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यानिमित्ताने सुप्रसिद्ध मराठी अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर व त्यांची कन्या सह्याद्री यांचा न्यू होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा हा मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष स्मिताताई वाघ, भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष देवयानीताई ठाकरे, अभियंता सेल प्रदेशाध्यक्ष
शुभम जयभाये, जिल्हाध्यक्ष महिला मोर्चा संगीताताई गवळी, तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम सर, शहराध्यक्ष नितीन पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस धनंजय मांडोळे, प्राचार्या साधनाताई निकम, शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभाताई चव्हाण, मोहिनी ताई गायकवाड, नमो ताई राठोड, सुलभाताई पवार, विजयाताई, चिराग शेख, अमोल नानकर, अमोल चव्हाण, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख राठोड, मनोज गोसावी, सचिन दायमा, माजी सभापती विजय जाधव, बबलू चव्हाण, बबन पवार, अविनाश नाना चौधरी, लोखंडे ताई, हरीश शिवरकर, सतीश पाटील, गोपाल पाटील, निलेश तेलंगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, चाळीसगाव तालुक्यात बचत गटांच्या प्रभाग संघांसाठी मेहुणबारे व देवळी येथे प्रभाग संघ इमारत बांधकाम आमदार निधीतून सुरु झालं आहे. पुढील काळात बहाळ – कळमडू, करगाव – टाकळी प्रचा, रांजणगाव पाटणा, वाघळी – पातोंडा, उंबरखेड – सायगाव या प्रभाग संघांना देखील निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

चाळीसगाव तालुक्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हळदी कुंकू महोत्सव, दहा हजारांहून अधिक महिलांच्या उपस्थिती खेळ रंगला पैठणीचा…

शिवनेरी फाउंडेशनच्या अध्यक्ष प्रतिभाताई मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून चाळीसगाव तालुक्यातील सर्वात मोठा हळदीकुंकू महोत्सवाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील बचत गटांच्या महिलांसाठी विविध बक्षिसे लकी ड्रॉ च्या माध्यमातून देण्यात आली. त्यात प्रथम बक्षिस म्हणून १ ग्रॅम सोन्याच्या ३ नथा, ३ पैठण्या, ३ मिक्सर भाग्यवान विजेत्यांना देण्यात आले. सदर कार्यक्रमाला दहा हजारहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दिली. सुप्रसिद्ध मराठी अभिनेते क्रांती नाना मुळेगावकर यांनी न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपस्थित महिला माता-भगिनींचे मनोरंजन केले तसेच चांगल्या पद्धतीने सहभागी होणाऱ्या महिलांना बक्षीस देखील दिली जळगाव तालुक्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर हळदीकुंकू महोत्सव साजरा होत असल्याने महिलांनी देखील या महोत्सवाचा व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचा आस्वाद घेत शिवनेरी फाउंडेशन चे कौतुक केले. आलेल्या प्रत्येक महिलेला शिवनेरी फाउंडेशनच्या वतीने वाण म्हणून भेटवस्तू देण्यात आली तसेच प्रत्येक महिलेसाठी अल्पोपहार व पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याने महिलांची कोणत्याही प्रकारची गैरसोय त्या ठिकाणी झाली नाही. या सुंदर अशा नियोजनाबद्दल उपस्थित महिलांनी शिवनेरी फाउंडेशन चे आभार मानले.

यावेळी आमदार स्मिताताई वाघ यांनी आमदार मंगेशदादा चव्हाण यांचे कौतूक करत आजपर्यंत जळगाव जिल्ह्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत सौ. प्रतिभाताई यांनी देखील महिलांसाठी भव्य अश्या कार्यक्रमाचे आयोजन करून तसेच त्याला भारतीय जनता पक्षाच्या शक्ती वंदन अभियानाची जोड देत एक पाऊल पुढेच टाकले असल्याचे सांगितले.

भाजपा जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की, महिला पुढे गेली तर घर पुढे जाते हा मोदिजींचा विचार आहे. जनधन योजनेच्या माध्यमातून बँकिंग क्षेत्रात महिलांना दिशा दिली. उज्वला योजनेच्या माध्यमातून घराघरात गॅस आल्याने धुळीपासून मुक्ती झाली. बचत गटांच्या माध्यमातून महिला आर्थिक सशक्त झाल्या. राज्य शासनाच्या नमो महिला सशक्तीकरण योजनेमुळे बचत गटांना बळकटी मिळाली आहे. मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर खऱ्या अर्थाने महिला सशक्तीकरणाला गती मिळाली आल्याचे त्यांनी सांगितले.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: