पोहण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू,गावात हळहळ
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
उपसंपादक रोहित शिंदे
चाळीसगाव(प्रतिनिधी)-19 सप्टेंबर 2021 चाळीसगाव तालुक्यातील वाघळी येथे पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी घडली
याबाबत वृत्त असे की, -ऐन अनंत चतुर्दशीच्या दिवशी तालुक्यातील वाघळी गावात दुर्दैवी घटना घडली आहे.तितूर नदीत पोहायला गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.वाघळी गावालगतच्या कमलेश्वर के.टी वेअर बंधाऱ्या जवळ ही घटना घडली आहे.साहिल शहा शरीफ शहा फकीर (वय17) आणि आयन शहा शरीफ शहा फकीर (वय14) हे दोघे भाऊ तितूर नदीत पोहण्यासाठी गेले होते.नदीत पोहत असतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून दोघांचा मृत्यू झाला. या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वाघळी सह पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान यातील एका मुलाचा मृतदेह तब्बल तीन तास शोध घेतल्यानंतर मिळून आले आहे. तर एकाचा शोध अद्याप सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मात्र एका मुलाचा अजून मृतदेह सापडून न आल्यामुळे युद्ध पातळीवर शोध सुरू आहेत.