Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

पुन्हा एक वार्ड एक नगरसेवक

0
3 0
Read Time1 Minute, 43 Second

आता एक वार्ड एक नगरसेवक पद्धत पुन्हा लागू महानगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीऐवजी प्रभागातून एक नगरसेवक व नगराध्यक्ष थेट निवडणूक पद्धत रद्द करून नगरसेवकांमधून निवड करण्याची जुनीच पद्धत पुन्हा सुरू करण्याचे विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आले.मात्र या बदलास भाजपाने विरोध केला.राज्यात सत्ता बदल होताच महानगरपालिका व नगरपालिकांमधील निवडणूक पद्धत बदलविण्याची परंपरा नवीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही सुरू ठेवली आहे.देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती.आता आगामी फेब्रुवारीमध्ये औरंगाबाद, नवी मुंबई महानगरपालिका तसेच अंबरनाथ व बदलापूर-कुळगावसह अन्य नगरपालिकांमध्ये हे बदल लागू होतील.महानगरपालिकांमध्ये एका प्रभागातून एकच नगरसेवक निवडून येईल. सध्या मुंबई वगळता सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या प्रभागांमध्ये चार नगरसेवक निवडून दिले जात होते तसेच नगराध्यक्षांची थेट जनतेतून निवडणूक होणार नाही. याऐवजी नगरपालिकांमधील निवडून आलेले नगरसेवक नगराध्यक्षांची निवड करतील.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: