प्रकाश दायी एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे कार्य प्रेरक लोकनियुक्तनगराध्यक्ष करण पवार यांचे प्रतिपादन
कासोदा (तालुका एरंडोल):दि 04 फेब्रुवारी 2020 मंगळवार रोजी कासोदा येथे प्रकाश दायी संस्थेतर्फे 33 पुरस्कारार्थीना मौलाना आझाद लोक मित्र पुरस्काराने सन्मानित प्रकाश दायी एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी मालेगाव शाखा कासोदा च्या वतीने सलमान करण्यात आली यावेळी या संस्थेचे कार्य प्रेरणादायी असल्याचे पारोळा नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करणदादा पवार यांनी म्हटले.सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महाराष्ट्रातील 33 पुरस्कारार्थी ना मौलाना आझाद लोकमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अब्दुल करीम सालार होते प्रमुख पाहुणे म्हणून पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण बाळासाहेब पाटील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पाकिजा पटेल जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष मच्छिंद्र पाटील विवेक ठाकरे महाराष्ट्र राज्यातील 38 शिक्षक संघटनांच्या राज्याध्यक्ष यांनी स्थापन केलेल्या शिक्षक संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मानकरी किशोर पाटील कुंझरकर सर ,प्राध्यापक शिवाजीराव अहिरराव ,फारुख शहा नोमानी हाजी तय्यब अली सलाउद्दीन अलाउद्दीन शेख अफसर अली हैदर अली संदीप वाघ आनंदा हरी मिस्त्री अब्दुल सत्तार पटेल आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी करण बाळासाहेब पाटील यांनी आपल्या भाषणात म्हणाले की प्रकाश दायी संस्था खरोखरच प्रकाश देण्याचे काम करीत आहे या पुरस्काराने पुरस्कार थिनां काम करण्याचे बळ मिळेल व दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल या संस्थेचे काम गौरव पथ असल्याचे सांगितले तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोगतात बोलताना किशोर पाटील कुंझरकर म्हणाले की, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव प्रेरणादायी बाबा आहे. समाजातील सर्वांनी पुढे येणे गरजेचे आहे माझ्यामध्ये समाज या शब्दाची व्याख्या म्हणजे हिंदू किंवा मुस्लिम नसून किंवा मराठा तेली माळी असा नसून भारत देशाच्या विकासासाठी चांगुलपणावर श्रद्धा ठेवून हक्क आणि कर्तव्याची जाणीव ठेवून जीवन जगणारा व्यक्ती समूह म्हणजे समाज असे माझे स्पष्ट मत आहे. हा समाज बलशाली सुदृढ करण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रित समन्वयाने काम करण्याची नितांत गरज असून संयोजकांनी समाजव्यवस्थेला बळकट करणारा चांगला कार्यक्रम घडवून आणला याचा सार्थ अभिमान असल्याचे असल्याचे प्रतिपादन किशोर पाटील कुंझरकर यांनी केले.अध्यक्षीय भाषणात अब्दुल करीम सालार यांनी सांगितले की संस्थेचे अध्यक्ष मो इन शेख व संयोजक नूरुद्दीन मुल्लाजी व त्यांच्या संस्थाने मानवतेचे काम केले असून अनेक क्षेत्रातील लोकांना त्यांनी गौरवान्वित केले आहे मौलाना आझाद यांचे प्रेरणादायी काम डोळ्यासमोर ठेवून पुरस्कार प्राप्त सत्कार मूर्ती काम करण्याचे आव्हान केले सूत्रसंचालन संयोजक नूरुद्दीन मुल्लाजी तर आभार आरिफ पेंटर यांनी मानले कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते पुरस्कार तीन ते नाव पुढील प्रमाणे डॉक्टर प्राध्यापक विजय मृत्युंजय शास्त्री प्राध्यापक प्रतापराव पवार पटेल बबीता उस्मान ईश्वर रामदास पाटील सचिन विठ्ठल राव राऊत सुनीलन न्हानू दाभाडे सौ अर्चना पंजाबराव पाटील शेख जावेद शेख याकु ब फिरोज रफिक शेख प्रतिभा विनोद कुमावत अनिल राजेंद्र गजरे उमेश श्रीराम पाटील डॉक्टर शेख अहमद पटेल नर्गिस अब्दुल खान सागर काशिनाथ रणधीर खाटीक आसिफ गुलाब चेतन एकनाथ राजपूत सौ सुनंदा उत्तम महाजन मुस्ताक अहमद मोहम्मद इक्बाल सालार जितेंद्र केवलसिंग पाटील सौ छाया शिवाजीराव सोनवणे अशफाक कबीर उद्दीन शेख ऐनुद्दीन सर धरणगाव शेख सलमान शेख शब्बीर भगतसिंग शालीग्राम पाटील शेखर रतनाकर बुंदेले प्राध्यापक समीर विष्णू घोडेस्वार प्रशांत राज सुपडु तायडे मुफती सय्यद अरशद अली जियाउद्दिन गयासुद्दीन काझी मोहम्मद उस्मान शेख अब्बास श्रीमती अनिता दशरथ मोरे शांताराम बळीराम कोळी यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.