बनावट खताचा साठा करून विक्री करणाऱ्यांना तात्काळ अटक करा संभाजी सेनेची तालुका कृषी अधिकारी व पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देऊन मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव बनावट खत विक्री करणार्यांना ८ दिवसाच्या आत तात्काळ अटक करा अटक न झाल्यास संभाजी सेना वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल अश्या आशयाचे निवेदन तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती तसेच चाळीसगाव पोलीस स्टेशन यांना देऊन मागणी करण्यात आली.
चाळीसगाव तालुक्यात गेल्या काही दिवसांत मोठया प्रमाणात बोगस खतांचा साठा आढळून आला असून तो साठा करणाऱ्या सर्व कृषी केंद्राचे परवाने तात्काळ कायमस्वरूपी रद्द करण्यात यावे व संबंधित व्यक्तींच्या परिवारातील इतर सदस्यास देखील नविन परवाने देण्यात येऊ नये याची खबरदारी घ्यावी. बोगस खतांचा साठा करणाऱ्या संबधित व्यक्तीस तात्काळ अटक करून कडक कार्यवाही करण्यात यावी.संपूर्ण देशाला अन्न-धान्य पुरवणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या या रॅकेट ची चौकशी होऊन त्याची पाळे-मूळे शोधून सर्व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी.बोगस खतांमुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येऊन ठेपली आहे कारन बोगस खतांमुळे लाखो रुपये खर्च करून शेतीमध्ये अपार कष्ट करून देखील शेतकऱ्यांच्या हाती उत्पन्न नगण्य स्वरूपात येते कारन खत च बनावट असेल तर उत्पन्न कुठून येणार… या रॅकेट चा जर आजच पर्दाफाश नाही झाला तर शेतकऱ्यांना फास घेण्याची वेळ येईल.तरी या हरामखोर निच व्यापारी प्रवित्तीला वेळीच ठेचून संबधित व्यक्तींवर कठोरात कठोर कार्यवाही करून तात्काळ अटक करण्यात यावी.
अश्या आशयाचे निवेदन संभाजी सेना च्या वतीने देण्यात येऊन त्याची प्रत महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री, कृषिमंत्री,जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आली.
सदर निवेदनावर गिरीश पाटील, अविनाश काकडे,दिवाकर महाले,बापूराव पाटील,ध्यानेश्वर पगारे,सुनील पाटील,अमोल पाटील,महेंद्रसिंग पाटील,कृष्णा पाटील,लक्ष्मण बनकर,रविंद्र शिनकर, राकेश पवार,संदीप जाधव,सुरेश पाटील,विजय देशमुख, भैय्यासाहेब देशमुख,अमर भोई,प्रवीण पाटील,आबासाहेब सैदाने, ऋषिकेश मोरे, मचिंद्र कोळी,इश्वर अहिरे,आदींच्या सह्या आहे.. सद्या जमावबंदी असल्याने या सर्वांच्या वतीने संभाजी सेना शहराध्यक्ष अविनाश काकडे यांनी सदरील निवेदन संबधित अधिकारी यांना दिले असून त्यात नमूद केल्याप्रमाणे दि.२०/६/२०२० पर्यन्त साठा करणाऱ्यांना अटक न झाल्यास संभाजी सैनिक संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब लक्ष्मण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उग्र स्वरूपाचे आंदोलन पुकारेल असा इशारा वजा संदेश देण्यात आला आहे.