महाराष्ट्राच्या ५५व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची यशस्वीरित्या सांगता,ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच शाश्वत आनंद लपलेला आहे
Read Time3 Minute, 39 Second
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
- दौंड(प्रतिनिधी)-सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज पुणे, 14 फेब्रुवारी, 2022: ‘‘ईश्वरीय इच्छेला सर्वोपरी मानण्यातच निखळ शाश्वत आनंद लपलेला आहे.” असे प्रतिपादन निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी रविवारी 13 फेब्रुवारी, 2022 रोजी महाराष्ट्राच्या 55व्या वार्षिक निरंकारी संत समागमाच्या सांगता समारोहात आपले आशीर्वाद प्रदान करताना केले.
आनंदाच्या अवस्थेवर प्रकाश टाकताना सद्गुरु माताजी म्हणाल्या, की जेव्हा आपण ईश्वराशी नाते जोडून त्याच्याशी एकरूप होऊ लागतो तेव्हा भक्तीचा असा काही रंग चढतो, की आम्हाला निरंतर आनंदाची अनुभूती प्राप्त होते. या आनंदामध्ये भक्त अशाप्रकारे तल्लीन होतो की, मग त्याच्यावर कोणाच्या वाईट बोलण्याचा अथवा दुर्व्यवहाराचा प्रभाव पडेनासा होतो. कारण भक्तीद्वारे त्यांने शाश्वत आनंदाची अवस्था प्राप्त केलेली असते.
जीवनात एकरस अवस्था तेव्हाच शक्य होते जेव्हा आपण अखंड एकरस राहणाऱ्या या निराकार प्रभुशी पूर्णपणे जोडले जातो. एका लोकोक्तिच्या माध्यमातून जीवनाच्या स्थितीचे वर्णन करताना सद्गुरु माताजींनी सांगितले, की ‘दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई’ अर्थात दु:खद अवस्थेमध्ये सर्वांना देवाची आठवण होते मात्र सुखात असताना तो ईश्वराच्या प्रति कृतज्ञतेचा भाव व्यक्त करायला विसरतो. सुख आणि दु:ख हे तर जीवनाचे महत्वाचे पैलु आहेत. ते जीवनात येतच राहणार; परंतु भक्त जेव्हा भक्तीच्या रंगात रंगलेला असतो तेव्हा तो क्षणोक्षणी आनंदाची अनुभूती घेत असतो आणि प्रभुच्या इच्छेमध्ये राहून सकारात्मक दृष्टिकोन अंगीकारतो. त्यामुळे मग दु:ख आले तरी तरी तो दु:खी होत नाही. ‘ या व्यतिरिक्त समागमाच्या तिन्ही दिवशी विविध भाषांतील वक्त्यांनी आपल्या भावना व्याख्चयान, गीत, भजन, कविता इत्यादि माध्यमांतून प्रस्तुत केल्या ज्यामध्ये अनेकतेत एकतेचे सुंदर दृश्य आणि वसुधैव कुटुंबकमची अद्भुत छबी दृष्टिगोचर झाली.
संत समागमाच्या सांगता समारोहातील सद्गुरु माताजींच्या दिव्य प्रवचनाचा आनंद भाविक भक्तगणांनी घेतला आणि विश्वास, भक्ती व आनंदाची अनुभूती प्राप्त केली. त्याचबरोबर स्वत:ला या निराकार ईश्वराशी एकरुप झाल्याची दिव्यानुभव प्राप्त केला, जो या संत समागमाचा मुख्य उद्देश होता.