मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज कोरोना विषाणू संदर्भात महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील मुद्दे मांडले:आपले सगळे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, महसूल खात्याचे कर्मचारी आहेत जे जे कोणी या युद्धात आपल्यासोबत अहोरात्र मेहनत करत आहे त्यांना मी धन्यवाद देतोय.काल आपल्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. सगळे जण मास्क लाऊन बसले होते, अंतर ठेऊन बसले होते. कदाचित व्हिडिओ कॉन्फरन्सने घेतलेली पहिली मंत्रिमंडळाची बैठक असेल.४ आठवड्यांमध्ये ग्राफ पाहिला तर तो वाढलेला आहे. वाढ नक्की होत आहे पण ही वाढ मला जरा सुद्धा नको. मला वाढ नको, मला तो ग्राफ खाली आणायचा आहे.हे युद्ध जिंकल्यानंतर मोठं युद्ध जे होऊ शकेल ते म्हणजे अर्थव्यवस्थेचं, त्या युद्धाला आपली तयारी पाहिजे. ताकद, हिंमत, जिद्द केवळ याच युध्दात नाही तर पुढच्याही युद्धात आपल्याला वापरायची आहे.ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही, त्यांच्यासाठी आपण शिवभोजन योजना लागू केली आहे. ती १ लाखापर्यंत जेवणाची सोय करण्याची परवानगी मी दिलेली आहे. पण त्याही पलीकडे जायचं असेल तर तेही करण्याची परवानगी आपण देऊन ठेवलेली आहे.मदत केंद्रांमध्ये जवळपास ५.५-६ लाख लोकांना दिवसाला ३ वेळा, सकाळची एक न्याहारी आणि दिवसाचं २ वेळेचं भोजन आपण त्यांना देतोय. सोबत डॉक्टर्स आहेत. माता-भगिनी, बालकांची वेगळी सोय केली आहे.केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे पण केंद्राने जी योजना दिली आहे त्यात फक्त तांदूळ आहे ज्याच वाटप सुरू झालेलं आहे. आणि ही योजना अन्न व्यवस्थेतील लाभार्थ्यांसाठी आहे म्हणजे केशरी कार्ड वाल्यांसाठी नाही आहे.मदत केंद्रांमध्ये जवळपास ५.५-६ लाख लोकांना दिवसाला ३ वेळा, सकाळची एक न्याहारी आणि दिवसाचं २ वेळेचं भोजन आपण त्यांना देतोय. सोबत डॉक्टर्स आहेत. माता-भगिनी, बालकांची वेगळी सोय केली आहे.केंद्राचं आपल्याला उत्तम सहकार्य आहे पण केंद्राने जी योजना दिली आहे त्यात फक्त तांदूळ आहे ज्याच वाटप सुरू झालेलं आहे. आणि ही योजना अन्न व्यवस्थेतील लाभार्थ्यांसाठी आहे म्हणजे केशरी कार्ड वाल्यांसाठी नाही आहे.मी माननीय पंतप्रधानांना काल एक प्रत्र दिलं आहे की आपण सगळ करत असताना ज्यांच उत्पन्न मासिक शहरामध्ये ५० हजार ते १ लाख आणि ग्रामीण भागामध्ये ४० हजार ते १ लाख आहे त्यांनासुद्धा आपण काहीतरी योजना केली पाहिजे.जे केशरी रेशन कार्ड वाले आहेत, त्यांना आपण ३ किलो गहू ₹८ प्रतिकीलो दराने आणि २ किलो तांदूळ ₹१२ प्रतिकिलो दराने आपण त्यांना उपलब्ध करून देत आहे.अनेकदा बातम्या येत आहेत की डॉक्टर्सना PPE किट्स, N95 मास्क नाही आहेत. पण त्याच वेळेला हे ही लक्षात घेतले पाहिजे की या उपकरणांचा जगभर तुटवडा आहे.जर जीवनावश्यक वस्तुंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा. मला तर असे वाटते की यातून बाहेर पडल्यानंतर पुढचे काही दिवस आपल्याला मास्क वापरला पाहिजे आपल्या सुरक्षेसाठी.आपण ठिकठिकाणी फिव्हर क्लिनिक खोलतोय. सर्दी, खोकला आणि ताप ही लक्षणे ज्यांना असतील त्यांनी इतर हॉस्पिटल मध्ये जाऊ नका, आपण फिव्हर क्लिनिक मध्ये जा. तिथे गेल्यावर तपासले जाईल आणि त्यानंतर मार्गदर्शन केले जाईल की आपण कुठे जायला पाहिजे.