Responsive Menu
Add more content here...
Responsive Menu
Add more content here...

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत चाळीसगाव तालुक्याचा समावेश करण्याची आमदार मंगेश चव्हाण यांची मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे मागणी

0
0 0
Read Time3 Minute, 46 Second

अधिकार आमचा न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी गफ्फार शाह

चाळीसगाव(प्रतिनिधी) -नुकत्याच सुरु झालेल्या मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत ऑनलाइन मागणी अर्ज भरताना जळगाव व धरणगाव हे दोनच तालुके वगळता जिल्ह्यातील इतर तालुक्यांची नावे येत नाहीत. या दोनच तालुक्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत असून, जिल्ह्यातील इतर १३ तालुक्यातील या योजनेसाठी गरजू शेतकरी डावलला जात आहे. या योजनेत प्रथम येणाऱ्यास (ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यास) किंबहुना क्रमवारीनुसार व अटीशर्ती पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. चाळीसगाव तालुक्यातील नवीन वीज जोडणीसाठी मागील अनेक वर्षांपासून हजारो अर्ज वीज वितरण कंपनीकडे प्रलंबित आहेत, चाळीसगाव तालुक्यातील नवीन शेतीपंप जोडणीसाठीची शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री सौर कृषी योजनेत चाळीसगाव तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी आग्रही मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्य शासनाकडे केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री गुलाबराव पाटील व उर्जामंत्री नितीन राउत यांना त्यांनी यासंदर्भात पत्र देऊन लक्ष वेधले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, चाळीसगाव तालुक्यात शेतीसाठी अत्याधुनिक साधने तसेच ठिबकचा वाढलेला वापर आहे. यामुळे कृषिपंप वीज जोडणीची महावितरण कंपनीकडे मागणी वाढली आहे. मात्र शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील २०११ पासून ३१ मार्च २०१८ पर्यंत ६०० ते ७०० शेतकऱ्यांना पैसे भरूनही वीज जोडणीची प्रतीक्षा आहे. विशेषत: मुबलक पाणी असतानाही केवळ कृषी पंपाची वीज जोडणी झालेली नसल्याने अनेकांना शेतीला पाणी देता येत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे विहिरीत पाणी असून अडचण नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत त्यांना नवीन वीज कनेक्शन एवजी स्वतंत्र ट्रान्सफार्मर दिली जात असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे. यावर पर्याय म्हणून वीज वितरण कंपनीमार्फत सौर उर्जेवर आधारित कृषी पंप बसविण्याचा शेतकऱ्यांना आग्रह केला जातो मात्र सौर कृषी योजना सुरु होऊनदेखील तालुक्यातील शेतकऱ्यांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात नसल्याने सदर योजनेपासून त्यांना वंचित राहावे लागत असल्याचे आमदार चव्हाण यांनी पत्रात नमूद केले आहे.

Happy
Happy
0 %
Sad
Sad
0 %
Excited
Excited
0 %
Sleepy
Sleepy
0 %
Angry
Angry
0 %
Surprise
Surprise
0 %

Average Rating

5 Star
0%
4 Star
0%
3 Star
0%
2 Star
0%
1 Star
0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!
%d bloggers like this: