मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांना मतदान केले,मात्र नगरपालिका प्रशासन ऐकत नसल्याचा माजी नगरसेवकाचे अजब आरोप
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक(शेख)
घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याचे कळताच आरोग्य निरीक्षक यांनी तात्काळ रात्री 3 वाजेच्या सुमारास नागद रोड परिसरात सफाई कर्मचाऱ्यांसोबत जाऊन नाले सफाई मोहीम सुरू केल्याचे आरोग्य निरीक्षक संजय गोयर यांनी फोन वर बोलतांना सांगितले असून नगरपालिका प्रशासन आपले कार्य करत असून नागरिकांनी सहकार्य करावे लवकरच कायम स्वरूपी उपययोजना नगरपालिका प्रशासन करणार असल्याचे देखील सांगितले
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात प्रत्येक प्रभागातील रस्ते असो या गटार स्वच्छता सर्व शहरातून नगरपालिका प्रशासनाच्या कार्यावर टीका अस्त्र सोडले जात आहे तसेच नागरपालिका आरोग्य विभाग कार्य करण्यास असमर्थ असल्याचे आरोप देखील शहरातून होतांना दिसत आहे. दि 27 रात्री चाळीसगावात मुसळधार पावसाने हजेरी लावली या मुसळधार पावसामुळे अनेक सखोल भागात पाणी शिरले
नागद रोड झोपडपट्टी परिसरात अर्ध्या रात्री शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी चक्क पाण्याच्या मोटारी लावून घरातील पाणी उपसले,यामुळे नागरिकांचे मोठया प्रमाणावर हाल झाले अंथरुणासह खाण्यापिण्याच्या वस्तू पाण्यात भिजल्या स्थानिक नागरिकांनी पालिकेवर तसेच लोकप्रतिनधींवर रोष व्यक्त केला.गटारी साफ न केल्याने आमच्या घरांमध्ये पाणी शिरले असल्याचा स्थानिकांचा आरोप केला आहे,स्थानिक कार्यकाळ संपलेले नगरसेवक शेखर देशमुख यांनी यावेळी नागद रोड परिसरात जात नागरिकांची विचार पूस केली मात्र जनतेच्या रोषाला सामोरे जात उत्तर देतांनी देशमुख यांनी नगरपालिका प्रशासनास यापूर्वी जवळपास 25 वेळा सांगितले आहे गटारी स्वच्छ करण्यासाठी मात्र प्रशासनाने नुसतं जेसिबी देतो असे वारंवार आश्वासन दिले मात्र सफाई काही झाली नाही कार्यकाळ संपलेले नगरसेवक देशमुख यांनी आपली बाजू मांडतांना सरळ सरळ नगरपालिका प्रशासनाच्या चुकी मुळे असे झाल्याचे स्पष्ट केले आहे, मूलभूत सुविधांसाठी नगरसेवकांना मतदान केले,मात्र असे अजब आरोप मात्र प्रतिनिधींनी करत आपली अशी जबाबदारी झटकून कसे चालणार हा सुद्धा प्रश्न उभा रहातो.