शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन व डीपी बंद करू नये व जे कनेक्शन व डीपी बंद केली आहे ती ताबडतोब चालू करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी विजय जाधव
दौंड(प्रतिनिधी)-शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन व डीपी बंद करू नये व जे कनेक्शन व डीपी बंद केली आहे ती ताबडतोब चालू करण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने म.रा.वि. वि. कंपनी चे कार्यकारी अधिकारी राजेंद्र येडके (उपविभाग केडगाव) यांना निवेदन देण्यात आले
मार्च अखेर वसूली कामी आपण जी मोहीम हाती घेतली आहे शेतकऱ्यांची कनेक्शन व डीपी बंद करून पण खूप मोठे शेतकर्यांचे नुकसान करत आहात आज खरे तर पूर्णवेळ लाईटची गरज असताना तुमच्या चुकीच्या धोरणामुळे तुम्ही विज बंद करताय हा शेतकऱ्यावर होणारा खुप मोठा अन्याय आहे.
वर्षाचे बारा महिने असतात नऊ महिने वसुलीची वेळी तुम्ही काय झोपा काढता काय ऐन उन्हाळ्यात तुम्हाला जाग येते? एक तर पाणी कमी असते आणि त्यातून तुम्ही लाईट बंद करता हे महावितरण व शासनाचे धोरण पूर्ण चुकीचे आहे तुम्ही 9 महीने कडक धोरण करा परंतु वीज या महिन्यात पूर्ण दाबाने व खंडित न करता वीज द्या आपण वरिष्ठांची बोलून वीज कनेक्शन व डीपी कनेक्शन कट न करता लवकरात लवकर चालू कशी करता येईल ते पहा शेतकऱ्यांचे नुकसान न होता महावितरण कंपनी व महाराष्ट्र शासन या दुष्काळात अस्मरणीय मदत होऊन शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल जर आपण याची अंमलबजावणी नाही केली तर म.रा.वि.वि. कंपनीच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने दिं.19/03/2021 रोजी निवेदन देऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा श्री किसन हंडाळ अध्यक्ष विधानसभा दौंड पक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांनी इशारा दिला आहे