जळगाव जिल्ह्यात नवीन निर्बंध लागू,काय सुरू काय बंद,संध्याकाळी 5 ते सकाळी 5 संचारबंदी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
जळगांव-कोविड19 विषाणूच्या वेगवेगळ्या स्वरुपातील डेल्टा, डेल्टा प्लस च्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात लागू असलेल्या विशेष निर्बंधांत वाढ करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे दि 27 जून 2021 रविवार पासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व स्थापने सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजे पर्यंत सुरू राहतील व शनिवार,रविवार बंद राहतील शॉपिंग मॉल,चित्रपट ग्रह बंद राहतील,संध्याकाळी 5 ते सकाळी 5 संचारबंदी लागू राहील विना कारण फिरण्यास मनाई असेल तसेच संध्याकाळी 5 ते सकाळी 5 जमावबंदी लागू असेल 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही पूर्वनियोजित कार्यक्रम,लग्नसमारंभ व अंत्यविधी वगळून.
बार,हॉटेल्स,रेस्टॉरंट 50 टक्के मर्यादेत दुपारी 4 वाजे पर्यंत सुरू राहतील व 4 ते 9 वाजे पर्यंत फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहील शनिवार रविवार फक्त पार्सल सुविधा उपलब्ध असेल,खाजगी कार्यालय कार्यालयीन वेळेत 50 टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजे पर्यंत सुरू राहतील,सामाजिक,राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रम 50 टक्के मर्यादेत 2 तासाच्या आत वेळेत पूर्ण करायची आहे,लग्न समारंभ 50 लोकांच्या उपस्थित दुपारी 4 वाजेच्या आत पूर्ण करायचे आहे,अंत्यविधि केवळ 20 लोकांच्या उपस्थित,
बांधकांम सुरू असतील मात्र दुपारी 4 नंतर ये जा करण्यास मनाई असेल,कृषी संबंधित सर्व कामे दुपारी 4 वाजे पर्यंत सुरू राहतील,इ कॉमर्स सुविधा सुरू असतील,जिम,स्पा,हेअर सलून,ब्युटीपार्लर व वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेत दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील व ए सी चा वापर करण्यास मनाई असेल सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेने सुरू राहील मात्र उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल,माल वाहतूक सुरू राहील केवळ 3 व्यक्तींकरिता चालक,क्लीनर व हेल्पर,अंतर जिल्हा प्रवास सुरु राहील मात्र लेव्हल 5 मध्ये समाविष्ट असलेल्या जिल्यात प्रवास करण्यासाठी पोलीस प्रशासनाची परवानगी आवश्यक असेल,अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती करणारे घटक व आस्थापना सुरू असतील, शाळा बंद असतील मात्र ऑनलाइन शिक्षण सुरू असेल
वरील प्रमाणे काही निर्बंध जिल्ह्यात लागू करण्यात आले असून मास्क न वापरणे,सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,सोशल डिस्टन्स चे पालन न करणे व गर्दी करणे या नियमांचे उल्लंघन करतील त्यांना 500 रु दंड आकारण्याची कारवाई स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाने करावी वरील नियमांचे पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागाची राहील असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.