अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना राहिलेली 75% भरपाई लवकरात लवकर द्यावी-आम आदमी पार्टी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
संपादक गफ्फार मलिक
चाळीसगांव(प्रतिनिधी)- सन 2021-22 मधील खरीप हंगाम कापूस पीक विमा राहिलेली 75% जोखीम स्तर
नुकसान भरपाई रक्कम द्यावी, ही मागणी सन 2021 अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना अनुदान मिळणे बाबत. आम आदमी पार्टी तर्फे चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
लवकरात लवकर 2021-22 मधील खरीप हंगाम कापूस पीक विमा राहिलेली 75% जोखीम स्तर नुकसान भरपाई रक्कम शासन स्थरावरून पाठपुरावा करत लवकरात लवकर अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना देण्यात यावी अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या वेळी आम आदमी पार्टी चे शहर अध्यक्ष ऍड राहुल जाधव यांनी दिला
काल दि 9 एप्रिल सोमवार रोजी सकाळी दहा
वाजेपासून आंदोलनाला सुरुवात झाली.विषय तालुक्यातील सन 2021-22 च्या खरीप हंगामात अगदी सुरुवातीला दोन अडीच महिने नगन्य अत्यल्प पाऊस
पर्जन्यमान झाले. त्यानंतर दोन वेळा अतिवृष्टी झाली या अशा दुहेरी संकटा मुळे शेतकरी पूर्णपणे खचून गेलेला आहे.
आर्थिक विवंचनेत अडकलेला आहे हे आपणा सर्वांना ज्ञात आहेत. विमा जोखीम 25% अग्रीम रक्कम पाच ते सहा महिन्यापूर्वी मिळाले परंतु आत्ता एप्रिल महिना संपून गेला तरी कापूस पीक विमा ची राहिलेले उर्वरित 75 % रक्कम नुकसान भरपाई मिळाली नाही. 75% उर्वरित रक्कम त्वरित मिळावी तसेच सन. 2021 मधील
खरीप हंगाम अवकाळी व अतिवृष्टीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित अनुदान वाटप व्हावे. यासाठी आम आदमी पार्टी चाळीसगांव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले व यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र धनराळे यांना निवेदन देत शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष केंद्रित करून देण्यात आले.