जिवंतपणी शहरात समस्याच समस्या मरणानंतर च्या यातना कमी होण्यासाठी भीक मांगो आंदोलन करण्याची वेळ नको
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव(प्रतिनिधी)-शहरात समस्या दिवसेंदिवस वाढत असून लोकप्रतिनिधींचे शहराकडे लक्ष नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे शहराची स्वच्छता असो की रस्त्यांवरील गड्डे वारंवार समाजसेवक पाठ पुरावा करत असतात मात्र लोकप्रतिनिधींच्या कानापर्यंत समाजसेवकांचा आवाज काही जात नाही की श्रेयाची लढाई समजून जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे,शहराची स्तिथी पाहता जीवनाचा प्रवास तर खडतर झाला आहे मात्र मरणानंतर सुद्धा यातना कमी नाही याचेच उदाहरण म्हणजे अमरधाम येथील शवदाहिन्या पुर्णपणे निकामी झाल्या असून लवकरात लवकर नूतन शवदाहिन्या बसवा असे निवेदन पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने देण्यात आले व जर शवदाहिन्या लवकर बसविल्या नाहीतर पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात “भिक मांगो आंदोलन”करण्यात येईल असा इशारा अध्यक्ष आकाश पोळ यांनी दिला आहे.
नगरपालिकेच्या अमरधाम येथील शवदाहिन्या पुर्णपणे निकामी झाल्या असुन त्याठिकाणी अंतसंस्कार करतांना नातेवाईकांना अडचणींना सामोरे जावे लागते आहे. तसेच सध्या स्थितीत कोरोना महामारी मुळे शहरातील अनेकांनी आपले प्राण गमविले आहे.आज जिवंत पणी तर हाल आहेच पण मूर्त झाल्यावर सुध्दा अमरधाम मध्ये हाल होत आहे.त्वरित त्याठिकाणी नुतन शवदाहिन्या बसविण्यात याव्या व लोकांची होणारी फरफड थांबवावी अन्यथा पीपल्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने शहरात “भिक मांगो आंदोलन”करण्यात येईल व त्यातुन मिळालेल्या पैसा जमा करून फाऊंडेशन च्या वतीने शवदाहिन्या बसविण्यात येईल असे मत फाउंडेशन अध्यक्ष आकाश पोळ यांनी व्यक्त केले.तसेच सदरील विषयांचे गांभिर्य पुर्वक विचार करून मागणी मान्यकरावी असे निवेदन उपमुख्याधिकारी स्नेहा फरतडे यांना देण्यात आले.यावेळी सामजिक कार्यकर्ते सदाशिव गवळी,मा.नगरसेवक प्रदीप राजपुत, पीपल्स सोशल फाऊंडेशन अध्यक्ष आकाश पोळ, उपाध्यक्ष शिवसागर पाटील,हर्षल माळी,प्रवीण जाधव ,अतुल चौधरी,गौरव पाटील,श्रीकांत आव्हाड,रोशन चव्हाण,प्रशांत पाटील,साहिल आव्हाड, सनी सरोदे, सुमित पवार,सारंग जाधव,हर्षल बोरसे,आदी उपस्थित होते