वृक्षाची कत्तल करणाऱ्यावर कारवाईची वृक्षप्रेमींची मागणी
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
प्रतिनिधी गफ्फार शाह
चाळीसगांव( प्रतिनिधी)- रस्त्याच्या कडेवरील एका झाडाची कुठलीहि पूर्व परवानगी न घेता एका तरुणाने कत्तल केली. याप्रकरणी संतप्त झालेल्या वृक्ष प्रेमींनी यावर कारवाई करावी अशी नगरपालिका, वन विभाग व पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वृक्ष लागवड करणे ही काळाची गरज असल्याने नारायणवाडी भागातील सागर गणेश मित्र मंडळातर्फे गेल्या पाच वर्षापूर्वी वृक्ष लागवड मोहीम राबविली होती. सर्वच झाडांचे संगोपन करत झाडे नागरिकांनी वाढवली. मात्र नारायण वाडी परिसरातील रहिवाशी मयुर पाटील ह्याने यातील एका झाडाची कुठलीही पूर्व परवानगी न घेता व झाडाची कुठलीही अडचण होत नसताना केवळ द्वेशापोटी ह्या झाडाची खोडापासून कापत कत्तल केली. याप्रकरणी परिसरातील वृक्षप्रेमिंनी संताप व्यक्त केला.
मायेनं वाढविलेल्या झाडाची कत्तल करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अश्या प्रकारांना आळा बसेल अश्या मागणीचे निवेदन नारायण वाडी परिसरातील वृक्षप्रमिंकडून नगरपालिका, वन विभाग व पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे. या निवेदनावर शुभम घुले, सागर धुमाळ, अशोक पाटील, ऋषिकेश चव्हाण, भिकन जगताप, नंदकिशोर रोकडे, रमेश सोनार, दादाभाऊ कुमावत, संजय पाटील, छोटू पंजे, संतोष कोळी, दीपक हातागळे, दिलीप मगर, प्रकाश कसबे, अतुल कसबे, राहुल राखुंडे व परिसरातील वृक्षप्रेमिंच्या सह्या आहेत.