दौंडच्या नागरीकांच्या सेवेसाठी पावसाळा सूरू होताच कुरकुंभ मोरीचे गटर केले चकाचक.
अधिकार आमचा न्यूज नेटवर्क
दौंड ग्रामीण प्रतिनिधी विजय जाधव
पावसाळा सुरू होण्यापूर्वी दौंड येथील रेल्वे कर्मकर्यांनी केले कुरकुंभ मोरीतील गटार,कुरकुंभ मोरीचा वापर मोठ्या प्रमाणात येथील नागरिक रहदारीचा करतात पण दरवर्षी पावसाळ्यात मात्र नागरिकांना येण्या जाण्यासाठी खूप कसरत करावी लागते मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे लोकांचे हाल होत असतात पण रेल्वे कर्मचाऱ्यांनी याची साफ सफाई करून येथील नागरिकांना दिलासा दिला आहे,पावसाळा आला म्हटले की दौंड करांच्या मनामध्ये एकच भिती असते ती कुरकुंभ मोरीतील साचलेले गटाराचे पाणी. कारण त्या पाण्यामुळे नागरीकांना भयंकर त्रास होतो. त्यामुळे रेल्वे कर्मचार्यानी मोरी साफ करून दौंड करांची मनातील भिती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.