राष्ट्रपती राजवट लागू होताच ९ जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकट.
Read Time1 Minute, 12 Second
मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रपती राजवट लागू होताच शेतकऱ्यांवर पुन्हा संकट आले आहे,महाराष्ट्रात सरकार स्थापन होऊ शकले नाही त्या मुळे ९ जिल्ह्यातील विमा कंपन्या राज्य सरकारशी करार करायला नकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा शेतकरी समोर संकट उभे राहिले आहे.
विमा कंपन्यांची सुरक्षा कोण घेणार? तोटा कोण भरून देणार? असे अनेक प्रश्न विमा कंपन्यांना पडलेला आहे.
राज्यातील लातूर, सोलापूर, हिंगोली, वाशीम, भंडारा, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यात रब्बी हंगामाचा पीकविमा घेण्यासाठी वारंवार निविदा काढण्यात येत आहेत. मात्र, पीक विमा कंपन्यांनी राज्य सरकारशी करार करायला नकार दिला आहे.
पण या सर्वात शेतकाऱ्यांचे संकट वाढले आहे.